शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कोल्हापुरात भरणार भटक्या-विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

कोल्हापूर : राज्यकर्त्यांकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी ...

कोल्हापूर : राज्यकर्त्यांकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय सामाजिक न्याय हक्क परिषद भरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याचे नियोजन करण्याचे शुक्रवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत ठरविण्यात आले.

दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भटक्या-विमुक्त जमाती विचार मंचच्या बैठकीत भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी राज्यभरातील आवाज एकत्रित करण्याचे ठरले. या बैठकीत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

वर्षानुवर्षे भटके आयुष्य जगणाऱ्या या समाजाला स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सोईसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडून योजना जाहीर होतात; पण त्याचा लाभ मिळत नाही. जातीचे, रहिवासाचे दाखले मिळत नाहीत; त्यामुळे घरकुलसारख्या याेजनांचे लाभ मिळत नाहीत. एनटी, व्हीजेएनटीअंतर्गत आरक्षण मिळते; पण त्याद्वारे नोकऱ्या मिळत नाहीत. आदिवासींच्या जागा भरल्या जात नाहीत. भटक्या-विमुक्त समाजाला एस.सी.मध्ये समाविष्ट करण्याची १९५० पासूनची मागणी आहे; पण त्याची पूर्तता झालेली नाही. या सर्व प्रलंबित प्रश्नांवर विचारमंथन करून समाजाची पुढील दिशा काय असेल, याबाबत या परिषदेत धोरण ठरवले जाणार आहे, असे व्यंकाप्पा भोसले यांनी स्पष्ट केले.

बैठकीला गणेश काळे, सुरेश चव्हाण, सुनील भोसले, शिवाजी कोरवी, तानाजी नंदीवले, राजू काळे, सुनील पवार, रामचंद्र पोवार, रामसिंग रजपूत, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.