शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

...तर येथून पुढे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे वाढदिवस नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST

कोल्हापूर : सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी ...

कोल्हापूर : सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या वाढदिवसासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत, जोवर कोसळलेल्या नदीघाटाची संरक्षक भिंत बांधत नाहीत, तोवर वाढदिवस होणार नाहीत, असा अनोखा निर्धार बुधवारी कोल्हापूरकरांनी केला.

पंचगंगा घाटावर कोसळलेल्या घाटाच्या ढिगाऱ्यावर झोपून, हातात भलामोठा फलक घेऊन येत्या एक मार्चपर्यंत दुरुस्ती केली नाही, तर नदीपात्रात उतरून आंदोलन करू, असा इशारावजा अल्टिमेटम्‌ही देण्यात आला.

पंचगंगा नदी घाटाची संरक्षक भिंत चार महिन्यांपूर्वी ढासळली आहे, याकडे लक्ष वेधूनही अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणीही दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील सामाजिक संस्था बुधवारी पंचगंगा घाटावर उतरल्या. यात इंजिनिअरिंग असोसिएशन, शहरभान चळवळ, शहर कृती समिती, आखरी रस्ता समिती, परीख पूल कृती समिती, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या संस्थांचे फिराेज शेख, अजय कोरोणे, जीवन बोडके, किशोर घाटगे, रमेश मोरे, अनिल घाटगे, संजयसिंह घाटगे, संतोष रेडेकर, संतोष आयरेकर, राजवर्धन यादव, शिवनाथ बियाणी, सुधीर हांजे, सुशील हांजे यांचा सहभाग होता.

पंचगंगा घाटाचे संवर्धन करण्यासाठी टाळाटाळ होत असेल, त्यांना वेळ नसेल, तर त्यांच्या वाढदिवसासाठी जाणे, शुभेच्छा संदेशावर खर्च करण्यासाठी वेळ नाही, असे उपहासात्मक बॅनर हातात घेऊन या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

चौकट ०१

माेफत स्ट्रक्चरल डिझाईन करून देण्यास पुढाकार

इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रशांत हडकर हे स्ट्रक्चर डिझायनर असल्याने या पडलेल्या संरक्षक भिंतीचे मूळ ढाचासह मोफत स्ट्र्क्चरल डिझाईन करून देण्यास तयार आहेत, अशी घोषणा अजय कोराणे यांनी केली.

फोटो: १७०२२०२१-कोल-पंचगंगा

फोटो ओळ:

पंचगंगा घाटावरील कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीस टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापुरातील संस्थांनी पंचगंगा नदीघाटावर वाढदिवस होणार नाही, असे बॅनर घेत उपहासात्मक आंदोलन करून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

(छाया : आदित्य वेल्हाळ)