शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

विधानसभेसाठी लाडक्या बहिणी उपेक्षितच; कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच महिला आमदार

By समीर देशपांडे | Updated: September 25, 2024 15:58 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : महिला मतदारांची संख्या जशी निम्म्यावर आली तसतशी महिलांची मते राजकारण फिरवू शकतात हे देखील राज्यकर्त्यांच्या ...

समीर देशपांडेकोल्हापूर : महिला मतदारांची संख्या जशी निम्म्यावर आली तसतशी महिलांची मते राजकारण फिरवू शकतात हे देखील राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी जसे महिलांना निवडणुकीवेळी गृहित धरले जात होते तसे आता होत नाही.गेल्या १५ वर्षांत महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना, कार्यक्रम आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना महाराष्ट्रात ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे, परंतु अजूनही विधानसभा, लोकसभेला ते मिळालेले नाही. परंतु, एकूणच परिस्थिती पाहता महिलांना उमेदवारी देण्यात सर्वच राजकीय पक्षांचा हात आखडता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पाच महिला आमदारविमला बागल, सरोजिनी खंजिरे, संजीवनी संजय गायकवाड, संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर, जयश्री चंद्रकांत जाधव अशा पाच आमदार आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आल्या होत्या. बागल वगळता उर्वरित चारही महिला आमदारांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवली होती. यातील कुपेकर आणि जाधव यांनी पोटनिवडणुका जिंकल्या आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. या चौघींपैकी कुपेकर या राष्ट्रवादीकडून, तर उर्वरित तिघी कॉंग्रेसकडून विजयी झाल्या होत्या.

यंदा १/२ महिलांना उमेदवारी मिळणार?सध्या जिल्ह्यात केवळ आमदार जयश्री जाधव या एकमेव महिला आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळाली, तर आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांच्याऐवजी शौमिका महाडिक रिंगणात उतरल्या, तर अशा सध्या दोनच महिलांची नावे चर्चेत आहेत. हे वगळता अन्य प्रमुख पक्षाच्या महिला उमेदवार अजूनही चर्चेत नाहीत.

पक्ष महिलांना प्राधान्य देणार?सुप्रिया सुधाकर साळोखे, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष : आज सर्वच क्षेत्रांत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. राजकारणामध्येही अनेक महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यामुळे राजकीय पक्षांनी महिलांना विधानसभा उमेदवारी देण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे.

शीतल फराकटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्ष : प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही. सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त महिला उमेदवार द्यावेत. त्यामुळे स्त्री सक्षमीकरणाचा पाया भक्कम होईल. येणाऱ्या काळात राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी.

रुपाराणी निकम, भाजप महिला जिल्हाध्यक्ष : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला आरक्षण आहे, परंतु लोकसभा, विधानसभेला अजूनही ते मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांनी राजकीय क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महिलांना उमेदवारी देण्याची गरज आहे.

अश्विनी माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट महिला जिल्हाध्यक्ष : आमचे नेते शरद पवार यांनीच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. लोकसभा, विधानसभेतही आरक्षण असावे ही त्यांची भूमिका आहे, परंतु काही पक्षांनी याला विरोध केला आहे.

शांता जाधव, उद्धवसेना महिला जिल्हाध्यक्ष : मतदार म्हणून महिलांना महत्त्व दिले जाते, परंतु उमेदवारी देताना मात्र पक्ष महिलांना फारशी संधी देत नाहीत, असे चित्र दिसते. पक्षांनी उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.

मंगलाताई साळोखे, शिंदेसेना महिला जिल्हाध्यक्ष : महिलांना राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे, परंतु अजूनही महिलांच्या उमेदवारीबाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निश्चितच विचार करतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाWomenमहिला