शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

‘स्मार्ट सिटी’त कोल्हापूरला ठेंगा

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन ‘स्मार्ट सिटी’ योजनेतसाठी सहकार्यचे आवाहन केले होते

कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला नाही. या योजनेत सहभागासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाने चिकाटीने प्रयत्न करूनही यश आले नाही. ‘स्मार्ट सिटी’त ठेंगा दाखवण्यात आल्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये निराशा पसरली आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन प्रशासनास ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनानेही सादर केलेल्या निकषांची पुनर्पडताळणी करत त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली होती. राज्यातील इतर महापालिकेच्या स्पर्धेत कोल्हापूर शहर कमी पडले. १०० गुणांपैकी तुलनेत कमी गुण पडल्यानेच शहराचा योजनेत समावेश होऊ शकला नाही. ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील या शहरांची निवड मुबलक पाणीपुरवठा, अखंड विद्युत पुरवठा, आदी १५ निकषांदारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून निवड केली आहे. (प्रतिनिधी)सीसी टीव्ही, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, वायफाय योजना, आदी प्रस्तावित योजनांचा मात्रा लागू झाली नाही. परिणामी शहर स्मार्ट सिटी योजनेपासून लांब राहिल्याची चर्चा आहे.सार्वजनिक वीजपुरवठा, नदी प्रदूषण, पार्किंग व्यवस्थेसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था, गरिबांसाठी घरे योजना, पारदर्शक प्रशासन या मुद्द्यावर महापालिका प्रशासन कमी पडले.स्मार्ट सिटी योजनेत कसोशीने प्रयत्न करूनही शहरास स्थान मिळाले नाही याचे दु:ख आहे. सोलापूर वगळता कोणत्याही लहान शहराचा यामध्ये समावेश झालेला नाही. केंद्र व राज्य शासनाच्या इतर अनेक योजनांतून शहरासाठी निधी आणून विकासाचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील. स्मार्ट योजनेत सहभाग नसला तरी यातील चांगल्या योजनांचे कामकाज यापुढेही सुरू राहील.- पी. शिवशंकर, आयुक्त, कोल्हापूर महापालिका‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला जाणून-बुजून राज्य सरकारने वगळले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत असून ते पुरते विदर्भवादी आहेत. - हसन मुश्रीफ, आमदार