शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

कुर्डूच्या माळावर टँकरमधून मळी

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

‘प्रदूषण नियंत्रण’ची माहिती : टँकर ‘भोगावती’च्या डिस्टिलरीचा असल्याचा संशय

कोल्हापूर : कुर्डू (ता. करवीर) जवळच्या माळावर मळीमिश्रीत रसायनाचा टँकर सोडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी निदर्शनास आले. हे टँकर भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून सोडल्याचा संशय आहे. ही डिस्टिलरी खासगी कंपनीतर्फे चालविण्यात येत आहे. गेल्यावेळेला सोडलेले पाणीही त्यांनीच सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.ट्रॅक्टरद्वारे हळदी परिसरात ओतलेले रसायनमिश्रीत पाणी भोगावती नदीत मिसळल्याने हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पाणी दूषित झाल्यामुळे गुरुवारी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाण्यावर मृत माशांचा खच लागला होता. मेलेले मासे गोळा करून नेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड उडाली. गेल्या २२ डिसेंबरलाही असाच प्रकार झाला होता. मळीमिश्रित पाणी नक्की सोडले कुणी याचा शोध कालही लागला नव्हता म्हणून शुक्रवारी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पुन्हा नदीकाठी जावून पाहणी केली. तेथून ते प्रदूषित पाण्याचा माग घेत चालत गेल्यावर हे पाणी कुर्डूजवळच्या माळावर सोडल्याचे लक्षात आले. ते पाणी शेतातून वाहून ओढ्यातून थेट भोगावती नदीत मिसळले. पाणी सोडलेल्या जागेपासून नदीपर्यंतचे अंतर साडेसातशे मीटर आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली. मासे मरण्याचे ते महत्त्वाचे कारण असल्याचे पाहणीत आढळून आले. काल रसायनामुळे पाणी प्रदूषित झाल्याचे सांगण्यात येत होते परंतू आज तिथे मळीचा वास येत होता. त्यामुळे साखर कारखान्यातील मळीच सोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही मळी कोणी सोडली, त्याचे टँकर कुणाचे होते, याची माहिती ज्यांच्या शेतातून ही मळी वाहत आली, त्या शेतकऱ्यांना बोलावून घेतली जाणार असल्याचे डोके यांनी सांगितले. गेल्यावेळेला पाणी कशामुळे प्रदूषित झाले हे शेवटपर्यंत समजले नव्हते. आता त्याचे कारण स्पष्ट झाल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे डोके यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अहवाल प्राप्त...गेल्या २२ डिसेंबरला जेव्हा असेच प्रदूषण झाले तेव्हा भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून तीन टँकर मळी बाहेर गेल्याची नोंद झाली होती परंतु ते टँकर कुठे गेले याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही. त्यावेळी नदीचे प्रदूषण झाल्यावर कारखान्याच्याच काही संचालकांनी पाटबंधारे मंडळास कळवून नदीत पाणी सोडायला लावले. धरणातून नदीत पाणी सोडल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे त्यावेळी पाणी प्रदूषित झाले नव्हते, असा अहवाल चिपळूण च्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे डोके यांनी सांगितले.कुर्डूजवळच्या ओढ्यात मळीचा प्रचंड वास येत होता. त्याची छायाचित्रे घेतली आहेत. या पाण्याचे तीन ठिकाणचे नमुने घेतले आहेत. ते देखील तपासणीसाठी चिपळूणला पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल. - एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर