शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर करणाऱ्यांना वगळा

By admin | Updated: January 19, 2017 00:37 IST

राजकीय पक्षांना आवाहन : तशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांना धडा शिकवणार; सकल मराठा समाज मेळाव्यात निर्णय

कोल्हापूर : ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा गैरवापर करणाऱ्या दलित उमेदवारांना राजकीय पक्षांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा निर्णय बुधवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात घेण्यात आला. तरीही कोणत्या पक्षाने अशा लोकांना उमेदवारी दिल्यास त्यांना मराठा समाज धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती अ‍ॅड. बाबा इंदूलकर, प्रा. जयंत पाटील, अजित राऊत, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, दिलीप पाटील, जयेश कदम, अशोक देसाई, डॉ. अभय कोटकर, संजय साळोखे, सचिन तोडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. जयंत पाटील म्हणाले, वैयक्तिक द्वेष, टोकाची राजकीय इर्ष्या, स्थानिक राजकारण अशा अनेक कारणांसाठी बहुतेक वेळा अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो, तसेच त्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे अशा खोट्या गुन्ह्णांत अडकलेल्या आरोपीस व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याला कुठे तरी पायबंद बसावा यासाठी सकल मराठा समाजातर्फे सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्या दलित उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना राजमान्यता मिळवून देऊ नये, तरीही दिल्यास याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. मराठा समाजाने अशा राजकीय पक्षांना या निवडणुकीत धडा शिकवावा.बाबा इंदूलकर म्हणाले, राज्यात दाखल होत असलेल्या एकूण गुन्ह्णांच्या तुलनेत अ‍ॅट्रॉसिटीचे प्रमाण हे ३० टक्के आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. याचा निकाल लागून अनेकजण निर्दोष सुटतात; परंतु दरम्यानच्या काळात त्याच्यासह कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आम्ही अशा पद्धतीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे.दिलीप देसाई म्हणाले, राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे इतर कायद्यांमध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई होते, परंतु अ‍ॅट्रॉसिटीमध्ये ती होत नाही. त्याचा त्रास मराठा समाजाला होत आहे. निवडणुकीत चारित्र्यवान दलित बांधवांना आम्ही मतदान करू पण गैरवापर करणाऱ्यांना विरोध केला जाईल.मुळीक म्हणाले, आतापर्यंत सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ न प्रयत्न केला आहे; परंतु तरीही असे प्रकार सुरू असल्याने आम्हाला या निर्णयापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नक्कीच गैरवापराला शह बसेल. यावेळी उमेश पोवार, अवधूत पाटील, उदय लाड, संदीप पाटील, संजय काटकर, स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेणार सकल मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यांना भेटणार असल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले.