शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कुशल, तंत्रज्ञ, हरहुन्नरी सुतार समाज

By admin | Updated: June 28, 2015 23:46 IST

जिल्ह्यात अडीच लाख लोकसंख्या : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक--सुतार समाज

प्रवीण देसाई - कोल्हापूर -बलुतेदारांमधील प्रतिभावंत, कुशल तंत्रज्ञ, हरहुन्नरीपणाचा वापर करत लाकूड व लोखंडापासून आखीवरेखीव वास्तुविश्व निर्माण करणारा समाज म्हणून सुतार समाजाची ओळख आहे. ‘जन्मजात अभियंता’ ही ओळख असलेल्या या समाजातील आताची पिढी नवतंत्रज्ञानाची कास धरत आहे. ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, मंदिरे, लेणी, पालख्या, आदींचे कलाकुसरीचे काम करणाऱ्या या समाजाला पूर्वी राजाश्रय होता. समाजातील कारागिरांनी केलेले कोल्हापुरातील न्यू पॅलेस, जुना राजवाडा, शालिनी पॅलेस, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप येथील लाकडावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर गावगाड्यातील शेतीसाठी उपयोगी व महत्त्वाची अवजारे, नांगर, कुळव, दिंड, खुरे, बांडगे, कुरी, कोळपे, डोक्याने तसेच बैलाचे जू यांसह ग्रामीण जीवनातील अविभाज्य भाग असलेली बैलगाडी सुतार समाजच करतो. औद्योगिक क्रांतीमुळे बलुतेदारी व्यवस्था कोलमडून गेली. प्रत्येक बलुतेदाराचे व्यवसाय बंद पडू लागले. हाताने करावयाची कामे यंत्रांवर होऊ लागल्याने कामाचा उरक वाढला. कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने काहींनी शहराकडे स्थलांतर केले. या व्यवसायात आता पारंपरिक साधनांबरोबर अत्याधुनिक साधनांचाही वापर सुरू झाला आहे. सुतारकाम आता हाताने रंधा मारण्यापेक्षा रंधायंत्रावर आले. करवतीने लाकूड कापण्यापेक्षा कटर यंत्राचा वापर, हॅँड ग्रॅँडर यंत्र आले. हाताने नक्षीकाम करण्यापेक्षा यंत्रावर नक्षी करता येऊ लागली. यंत्रे वापरून नवनव्या व लाकडी वस्तू तयार केल्या जात आहेत. जिल्ह्यात सुतार समाजाचे दोन लाखांहून अधिक समाजबांधव आहेत. त्यापैकी सुमारे ५० हजार बांधव हे कोल्हापूर शहरात विशेषत: उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, आदी परिसरात वास्तव्यास आहे.भावी पिढी शिकून, सुसंस्कारित होऊन हा समाज देशपातळीवर प्रगतिपथावर येईल, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सुतार-लोहार समाजातील प्रतिष्ठित लोकांना बोलाविले. त्यांच्यासमोर मुलांच्या शिक्षणासाठी सुतार समाज वसतिगृहाचा प्रस्ताव मांडून तुम्ही कलाकार व जन्मजात अभियंता आहात, तुमच्या समाजासाठी व भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता वसतिगृहाची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९२१ साली रंकाळा टॉवरजवळ तयार इमारत वसतिगृहाला दिली. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची नियुक्ती केली. त्यानंतर बाळकोबा रामचंद्र सुतार हे २५ वर्षे अध्यक्ष होते. पांडुरंग मरळकर, पांडुरंग बांदिवडेकर, रवींद्र मेस्त्री, निवृत्ती सातवेकर, शिवाजी सौंदलगेकर, शिवाजीराव सुतार, विष्णुपंत सुतार, धोंडिराम हिरवडेकर, माजी उपमहापौर आनंदराव सुतार, आदींनी या वसतिगृहाच्या संचालक पदावर काम करीत समाजासाठी चांगले कार्य केले. सध्या नारायण सुतार हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहात राहून शिक्षण घेत शेकडो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यामधील अनेकजण शासकीय सेवेत मोठ्या पदांवर काम करून निवृत्त झाले आहेत. दहावी, बारावीसह स्पर्धा परीक्षेतही या समाजातील मुले चमकत आहेत. नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षेत कोगेच्या वैष्णवी नामदेव सुतार हिने ९३.६० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले आहे. उजळाईवाडी येथे नारायण निट्टूरकर, उद्योजक वसंतराव लोहार, पांडुरंग सोनाळकर, शंकरराव लोहार, राम सुतार यांनी अथक प्रयत्नाने दीड एकर जागेवर विश्वकर्मानगर ही घरकुल योजना उभारली आहे.