शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सायझिंग उद्यापासून सुरू होण्याची चिन्हे

By admin | Updated: September 10, 2015 00:56 IST

किमान वेतन प्रश्न : बोलणी निर्णायक वळणावर

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबत खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे व कामगार नेते ए. बी. पाटील यांच्यात झालेल्या चर्चेमुळे संपाची कोंडी फुटून बुधवारी दिवसभरात वीस कारखान्यांवर मालक व कामगारांमध्ये बोलणी झाली. अशा पार्श्वभूमीवर गेले ५१ दिवस बंद असलेले सायझिंग कारखाने शुक्रवार (दि. ११) पासून मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याची चिन्हे आहेत. यंत्रमाग कामगारांना शासनाने जाहीर केलेले सुधारित किमान वेतन मिळण्याच्या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कामगारांच्या संपामध्ये तोडगा काढण्यासाठी कामगारमंत्री प्रकाश मेहता व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायझिंगधारक व कामगार संघटना यांच्या मुंबईत बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथे बैठका आयोजित केल्या होत्या. अशाच बैठका प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी घेतल्या. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना निर्णायक यश आले नव्हते. संप लांबत चालल्यामुळे आगामी गणेश चतुर्थी व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अशांतता माजवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी येथील राजीव गांधी भवनमध्ये शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, यंत्रमाग उद्योगाशी निगडित असलेल्या संघटना व सायझिंगधारक आणि कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीमध्ये अडीच तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हाधिकारी सैनी यांनी उच्च न्यायालयामध्ये असलेल्या याचिकेवरील निकालाला आधीन राहून कामगारांना ५०० रुपये वाढ द्यावी आणि कारखाने सुरू करावेत, असा प्रस्ताव दिला होता. तरीही संपाची कोंडी फुटली नाही. मंगळवारी खासदार शेट्टी हे येथील पॉवरलूम असोसिएशनमध्ये आले असताना त्यांच्यात व माजी मंत्री आवाडे यांच्यामध्ये चर्चा होऊन कामगार नेते पाटील यांच्याबरोबर बैठक घेण्याचे ठरले. समाजवादी प्रबोधिनीमध्ये सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये कारखाना स्थळावर कामगारांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आणि सायझिंग कारखाने सुरू करावेत, असे ठरले. याला बुधवारी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुमारे वीस-बावीस सायझिंग कारखान्यांवर कामगार व सायझिंगधारक यांच्यामध्ये चर्चा झाली. याला दुजोरा देण्यात आला. त्यामुळे नजीकच्या दोन-तीन दिवसांत चर्चा झालेल्या ठिकाणचे सायझिंग कारखाने सुरू होतील. यालाच अनुसरून अन्य सायझिंगमध्ये सुद्धा चर्चा करून ते कारखाने मोठ्या संख्येने सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गरजवंत कामगार कुटुंबीयांना धान्य वाटप बुधवारी थोरात चौकामध्ये सायझिंग कामगारांचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कामगार नेते पाटील, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. त्यावेळी मंगळवारी समाजवादी प्रबोधिनीमध्ये झालेल्या खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांच्या बैठकीतील वृत्तांत सांगण्यात आला. तसेच मदत फेरीतून जमलेले आणि कागल पंचतारांकित वसाहतीमधून मिळालेले धान्य व निधी यांचे गरजवंत कामगारांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात आले.(प्रतिनिधी)