शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:13 IST

सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुकमंगळवार, बुधवार, रविवारी सेवा; तिकीट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन

कोल्हापूर : सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.धावपट्टीची दुरुस्ती, नागरी वाहतुकीचा परवाना, आदी कारणांमुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या कोल्हापूरच्या विमानसेवा प्रारंभाचा दि. २२ एप्रिल हा मुर्हूत निश्चित झाला आहे. एअर डेक्कन कंपनीने रविवारी (दि. ८) घेतलेल्या विमान उड्डाणाच्या चाचणीमुळे या मुर्हूतावर शिक्कामोर्तब झाला.

‘उडान’ योजनेअंतर्गत ‘एअर डेक्कन’कडून कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि रविवारी पुरविली जाणार आहे. यासाठी १८ आसनी विमान आहे. यातील पहिल्या नऊ आसनांसाठी ‘उडान’ अंतर्गत १९७० रुपये तिकीट दर आहे. उर्वरीत जागांसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये तिकीट दर असणार आहे.

तिकीटाची नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन आहे. ‘एअर डेक्कन’च्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावयाची आहे. कोल्हापूरमधून मुंबईला टेकआॅफ करणाऱ्या पहिल्या विमानामध्ये बसण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यासाठी तिकीट नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद आहे.

एअर डेक्कनने त्यांच्या संकेतस्थळावर कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची माहिती गेल्या चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर रविवारी एअर डेक्कनने विमान उड्डाणाची चाचणी घेतली. आणखी चार दिवस ही चाचणी केली जाणार आहे.

सांताक्रूझ टर्मिनसवर उतरणार विमानमुंबईतून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान कोल्हापुरमध्ये २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापुरातून ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबई येथे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईमध्ये सांताक्रूझ विमानतळावरील टर्मिनस वन-ए येथे कोल्हापूरहून जाणारे विमान उतरणार आहे.

विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरचा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोल्हापूरच्या पर्यटन, औद्योगिक, शिक्षण, कला-सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विकासाला गती मिळणार आहे. मुंबई-कोल्हापूर प्रवासासाठीचा वेळ वाचणार आहे.-समीर शेठ, सदस्य,कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती

 

विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरला खूप फायदा होणार आहे. उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय सेवा-सुविधा, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये विकासाची पाऊले निश्चितपणे पडणार आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या तिकीट नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद आहे.- बी. व्ही. वराडे, विभागीय व्यवस्थापक, ट्रेड विंग्ज् लिमिटेड

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर