शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नागपूर-कोल्हापूर रेल्वेतील सहा प्रवासी जखमी, : लोखंडी फलक घासून दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:31 IST

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले.

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ ते सलगरे स्थानकादरम्यान हा विचित्र अपघात घडला. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूर ते मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ स्थानक सोडल्यानंतर सलगरे स्थानक येण्यापूर्वी रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून धावत्या रेल्वेला घासला. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला तो घासत गेला. यामुळे काही क्षणातच एस-२, एस-४, एस-९ यासह जनरल बोगीतील खिडकीकडेला हात बाहेर काढून किंवा खिडकीत ठेवून बसलेले, दारात उभे राहिलेले सहा प्रवासी जखमी झाले.

यामुळे एक्स्प्रेसमध्ये गोंधळ उडाला. हात आणि चेहऱ्याला पत्रा कापल्याने रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांना सलगरे स्थानकावर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. यामुळे एक्स्प्रेस मिरजेला येईपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेसच्या डब्यांतील आसने रक्ताने भिजली होती. जखमी प्रवासी व नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. मिरज स्थानकात रेल्वे पोलीस, सुरक्षा दल व स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी जखमींना रिक्षांतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातात नासिरअली हसनअली सय्यद (वय ४३, रा. शिंदे मळा, सांगली), राजेश हरिश्चंद्र वरघडे (४४, रा. सौभाग्यनगर, नागपूर), सिरील डॅनियल तिरोरे (६२, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), बळवंत नानू शिंदे (३०, रा. धामोड, ता. राधानगरी) या हातावर व चेहºयावर जखमा झालेल्या चार प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेमुळे नागपूर एक्स्प्रेस एक तास विलंबाने कोल्हापूरकडे रवाना झाली. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात नोंद आहे. रेल्वे अधिकºयांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.घातपाताचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावाअपघातात सय्यद, तिरोरे व शिंदे या प्रवाशांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर विभागाच्या रेलपथ विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमार्गालगत कोणताही फलक किंवा खांब तुटलेला नसून, कोणीतरी बाहेरून काहीतरी फेकल्यामुळे प्रवासी जखमी झाले असावेत, असा रेल्वे अधिकाºयांनी दावा केल्यामुळे अपघाताबाबत गूढ निर्माण झाले आहे.