शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

नागपूर-कोल्हापूर रेल्वेतील सहा प्रवासी जखमी, : लोखंडी फलक घासून दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:31 IST

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले.

मिरज : सलगरेजवळ रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला घासल्याने रेल्वेत खिडकीकडेला बसलेले सहा प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ ते सलगरे स्थानकादरम्यान हा विचित्र अपघात घडला. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूर ते मिरज रेल्वेमार्गावर कवठेमहांकाळ स्थानक सोडल्यानंतर सलगरे स्थानक येण्यापूर्वी रेल्वेमार्गालगत लावलेला लोखंडी फलक तुटून धावत्या रेल्वेला घासला. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला तो घासत गेला. यामुळे काही क्षणातच एस-२, एस-४, एस-९ यासह जनरल बोगीतील खिडकीकडेला हात बाहेर काढून किंवा खिडकीत ठेवून बसलेले, दारात उभे राहिलेले सहा प्रवासी जखमी झाले.

यामुळे एक्स्प्रेसमध्ये गोंधळ उडाला. हात आणि चेहऱ्याला पत्रा कापल्याने रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांना सलगरे स्थानकावर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. यामुळे एक्स्प्रेस मिरजेला येईपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेसच्या डब्यांतील आसने रक्ताने भिजली होती. जखमी प्रवासी व नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. मिरज स्थानकात रेल्वे पोलीस, सुरक्षा दल व स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी जखमींना रिक्षांतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातात नासिरअली हसनअली सय्यद (वय ४३, रा. शिंदे मळा, सांगली), राजेश हरिश्चंद्र वरघडे (४४, रा. सौभाग्यनगर, नागपूर), सिरील डॅनियल तिरोरे (६२, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), बळवंत नानू शिंदे (३०, रा. धामोड, ता. राधानगरी) या हातावर व चेहºयावर जखमा झालेल्या चार प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेमुळे नागपूर एक्स्प्रेस एक तास विलंबाने कोल्हापूरकडे रवाना झाली. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात नोंद आहे. रेल्वे अधिकºयांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.घातपाताचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावाअपघातात सय्यद, तिरोरे व शिंदे या प्रवाशांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर विभागाच्या रेलपथ विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताच्या ठिकाणी रेल्वेमार्गालगत कोणताही फलक किंवा खांब तुटलेला नसून, कोणीतरी बाहेरून काहीतरी फेकल्यामुळे प्रवासी जखमी झाले असावेत, असा रेल्वे अधिकाºयांनी दावा केल्यामुळे अपघाताबाबत गूढ निर्माण झाले आहे.