शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Kolhapur Politics: सत्तेसाठी सोडले पक्ष..जनतेचे आहे लक्ष; निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारले

By विश्वास पाटील | Updated: February 14, 2024 11:38 IST

कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सहा आमदार व दोन खासदारांनी त्यांना निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारून सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे. त्याची सुरुवात १९९० च्या निवडणूकीत झाली. परंतू कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास आहे. आता कोल्हापूरचा स्वाभिमानी, जागरुक माणूस आगामी लोकसभा व विधानसभेला त्याची पुनरावृत्ती करतो की सत्तेला सलाम करून पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा गुलाल लावतो हीच उत्सुकता असेल. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.जिल्ह्याने १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेचे दोन आमदार पहिल्यांदा निवडून दिले. बाबासाहेब पाटील सरुडकर शाहूवाडीतून व कोल्हापूर शहरातून नवखे दिलीप देसाई विजयी झाले. पुढच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांच्या संगतीने या दोघांनीही शिवसेना सोडली व काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतू पुढच्या १९९५ च्या निवडणूकीत या सरुडकर व देसाई यांच्या पत्नी शिवानी देसाई यांचा पराभव झाला.शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड अपक्ष म्हणून विजयी झाले व कोल्हापूरातून शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना लोकांनी निवडून दिले. त्यानंतर दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्याविरोधात बंड केले आणि अपक्ष निवडणूक लढवून विजय खेचून आणला. या लढाईला अस्मितेच्या लढाईचे स्वरुप प्राप्त झाले.

चालू पंचवार्षिकमध्ये मात्र महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही फाटाफुटीचे पेव फुटले. शिवसेनेमुळेच विजयी झालेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाशी घरोबा केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेने दोनवेळा आमदार केले. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून येवूनही त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. या दोघांनीही पक्ष सोडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संगत सोडून अजित पवार यांच्यासोबत ते भाजपच्या सरकारमध्ये गेले. रोज उठता-बसता फुले-शाहू -आंबेडकर यांचा जप करणाऱ्या मुश्रीफ यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्याचा विडाच उचलला आहे.याशिवाय जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलला आहे. त्यातील कांहीना मतदार संघाची अपरिहार्यता होती. प्रस्थापित पक्षात संधी मिळत नसल्यानेही कांहीनी मुळ पक्षाला रामराम केला.

  • माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कधीच कोणत्याच पक्षाच्या विचारधारेशी देणेघेणे नव्हते. ते स्वत:लाच एक पक्ष समजत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह सोयीनुसार शिवसेनेशीही सलगी केली. संधी मिळताच मुलग्याला भाजपमध्ये नेवून आमदार केले.
  • ज्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसच्या विचारात वाढल्या, त्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या निवडणूकीत मतदार संघातील भाजपच्या प्रभावाला शरण जावून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व अपक्ष म्हणून निवडून आले. ते आता भाजपच्या सोबत आहेत.
  • माजी खासदार निवेदिता माने यांचे सासरे दिवंगत बाळासाहेब माने हे इचलकरंजीचे पाचवेळा खासदार होते परंतू त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास केला.
  • धनंजय महाडिक यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरु झाली. शिवसेनेनेच त्यांना लोकसभेला पहिल्यांदा संधी दिली. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांची पाच वर्षे कुजवली व नंतर खासदार केले. तिथेही पराभव होताच त्यांनी वारे पाहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.
  • समरजित घाटगे यांचे मुळ घराणे काँग्रेसचे. विक्रमसिंह घाटगे एकदा अपक्ष, नंतर काँग्रेसकडून आमदार झाले. शिवसेनेकडून एक लोकसभा लढवली. परंतू समरजित यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली.
  • माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वत:चा पक्ष असला तरी त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर २०१४ ला त्यांना भाजप बरा वाटला. तिथे भ्रमनिरास झाल्यावर २०१९ ला पुन्हा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आता अजून त्यांचे तळ्यातमळ्यात सुरु आहे.
  • संभाजीराजे यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादीतून सुरु झाली. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. आता ते पुन्हा काँग्रेसच्या सोबत राजकारण करण्याच्या तयारीत आहेत.
  • विनय कोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून आमदार झाले नंतर त्यांनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. आता ते भाजपच्या सोबत आहेत.
  • संजय घाटगे यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरु झाली.त्यानंतर त्यांनी जनता दल, शिवसेना, परत काँग्रेस, परत शिवसेना नंतर स्वाभिमानी व त्यानंतर दोनवेळा शिवसेना अशी फेऱ्या मारल्या. एवढ्या काळात त्यांना जून १९९८ ते ऑक्टोबर १९९९ या काळात दीड वर्षे आमदारकीची संधी मिळाली.
  • उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते परंतू विधानसभेला संघटनेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि आमदार झाले. आता पुन्हा ते संघटनेच्या जवळ आले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण