शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: सत्तेसाठी सोडले पक्ष..जनतेचे आहे लक्ष; निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारले

By विश्वास पाटील | Updated: February 14, 2024 11:38 IST

कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सहा आमदार व दोन खासदारांनी त्यांना निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारून सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे. त्याची सुरुवात १९९० च्या निवडणूकीत झाली. परंतू कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास आहे. आता कोल्हापूरचा स्वाभिमानी, जागरुक माणूस आगामी लोकसभा व विधानसभेला त्याची पुनरावृत्ती करतो की सत्तेला सलाम करून पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा गुलाल लावतो हीच उत्सुकता असेल. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.जिल्ह्याने १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेचे दोन आमदार पहिल्यांदा निवडून दिले. बाबासाहेब पाटील सरुडकर शाहूवाडीतून व कोल्हापूर शहरातून नवखे दिलीप देसाई विजयी झाले. पुढच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांच्या संगतीने या दोघांनीही शिवसेना सोडली व काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतू पुढच्या १९९५ च्या निवडणूकीत या सरुडकर व देसाई यांच्या पत्नी शिवानी देसाई यांचा पराभव झाला.शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड अपक्ष म्हणून विजयी झाले व कोल्हापूरातून शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना लोकांनी निवडून दिले. त्यानंतर दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्याविरोधात बंड केले आणि अपक्ष निवडणूक लढवून विजय खेचून आणला. या लढाईला अस्मितेच्या लढाईचे स्वरुप प्राप्त झाले.

चालू पंचवार्षिकमध्ये मात्र महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही फाटाफुटीचे पेव फुटले. शिवसेनेमुळेच विजयी झालेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाशी घरोबा केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेने दोनवेळा आमदार केले. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून येवूनही त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. या दोघांनीही पक्ष सोडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संगत सोडून अजित पवार यांच्यासोबत ते भाजपच्या सरकारमध्ये गेले. रोज उठता-बसता फुले-शाहू -आंबेडकर यांचा जप करणाऱ्या मुश्रीफ यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्याचा विडाच उचलला आहे.याशिवाय जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलला आहे. त्यातील कांहीना मतदार संघाची अपरिहार्यता होती. प्रस्थापित पक्षात संधी मिळत नसल्यानेही कांहीनी मुळ पक्षाला रामराम केला.

  • माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कधीच कोणत्याच पक्षाच्या विचारधारेशी देणेघेणे नव्हते. ते स्वत:लाच एक पक्ष समजत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह सोयीनुसार शिवसेनेशीही सलगी केली. संधी मिळताच मुलग्याला भाजपमध्ये नेवून आमदार केले.
  • ज्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसच्या विचारात वाढल्या, त्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या निवडणूकीत मतदार संघातील भाजपच्या प्रभावाला शरण जावून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व अपक्ष म्हणून निवडून आले. ते आता भाजपच्या सोबत आहेत.
  • माजी खासदार निवेदिता माने यांचे सासरे दिवंगत बाळासाहेब माने हे इचलकरंजीचे पाचवेळा खासदार होते परंतू त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास केला.
  • धनंजय महाडिक यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरु झाली. शिवसेनेनेच त्यांना लोकसभेला पहिल्यांदा संधी दिली. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांची पाच वर्षे कुजवली व नंतर खासदार केले. तिथेही पराभव होताच त्यांनी वारे पाहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.
  • समरजित घाटगे यांचे मुळ घराणे काँग्रेसचे. विक्रमसिंह घाटगे एकदा अपक्ष, नंतर काँग्रेसकडून आमदार झाले. शिवसेनेकडून एक लोकसभा लढवली. परंतू समरजित यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली.
  • माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वत:चा पक्ष असला तरी त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर २०१४ ला त्यांना भाजप बरा वाटला. तिथे भ्रमनिरास झाल्यावर २०१९ ला पुन्हा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आता अजून त्यांचे तळ्यातमळ्यात सुरु आहे.
  • संभाजीराजे यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादीतून सुरु झाली. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. आता ते पुन्हा काँग्रेसच्या सोबत राजकारण करण्याच्या तयारीत आहेत.
  • विनय कोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून आमदार झाले नंतर त्यांनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. आता ते भाजपच्या सोबत आहेत.
  • संजय घाटगे यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरु झाली.त्यानंतर त्यांनी जनता दल, शिवसेना, परत काँग्रेस, परत शिवसेना नंतर स्वाभिमानी व त्यानंतर दोनवेळा शिवसेना अशी फेऱ्या मारल्या. एवढ्या काळात त्यांना जून १९९८ ते ऑक्टोबर १९९९ या काळात दीड वर्षे आमदारकीची संधी मिळाली.
  • उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते परंतू विधानसभेला संघटनेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि आमदार झाले. आता पुन्हा ते संघटनेच्या जवळ आले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण