शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

Kolhapur Politics: सत्तेसाठी सोडले पक्ष..जनतेचे आहे लक्ष; निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारले

By विश्वास पाटील | Updated: February 14, 2024 11:38 IST

कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सहा आमदार व दोन खासदारांनी त्यांना निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारून सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे. त्याची सुरुवात १९९० च्या निवडणूकीत झाली. परंतू कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास आहे. आता कोल्हापूरचा स्वाभिमानी, जागरुक माणूस आगामी लोकसभा व विधानसभेला त्याची पुनरावृत्ती करतो की सत्तेला सलाम करून पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा गुलाल लावतो हीच उत्सुकता असेल. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.जिल्ह्याने १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेचे दोन आमदार पहिल्यांदा निवडून दिले. बाबासाहेब पाटील सरुडकर शाहूवाडीतून व कोल्हापूर शहरातून नवखे दिलीप देसाई विजयी झाले. पुढच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांच्या संगतीने या दोघांनीही शिवसेना सोडली व काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतू पुढच्या १९९५ च्या निवडणूकीत या सरुडकर व देसाई यांच्या पत्नी शिवानी देसाई यांचा पराभव झाला.शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड अपक्ष म्हणून विजयी झाले व कोल्हापूरातून शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना लोकांनी निवडून दिले. त्यानंतर दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्याविरोधात बंड केले आणि अपक्ष निवडणूक लढवून विजय खेचून आणला. या लढाईला अस्मितेच्या लढाईचे स्वरुप प्राप्त झाले.

चालू पंचवार्षिकमध्ये मात्र महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही फाटाफुटीचे पेव फुटले. शिवसेनेमुळेच विजयी झालेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाशी घरोबा केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेने दोनवेळा आमदार केले. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून येवूनही त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. या दोघांनीही पक्ष सोडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संगत सोडून अजित पवार यांच्यासोबत ते भाजपच्या सरकारमध्ये गेले. रोज उठता-बसता फुले-शाहू -आंबेडकर यांचा जप करणाऱ्या मुश्रीफ यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्याचा विडाच उचलला आहे.याशिवाय जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलला आहे. त्यातील कांहीना मतदार संघाची अपरिहार्यता होती. प्रस्थापित पक्षात संधी मिळत नसल्यानेही कांहीनी मुळ पक्षाला रामराम केला.

  • माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कधीच कोणत्याच पक्षाच्या विचारधारेशी देणेघेणे नव्हते. ते स्वत:लाच एक पक्ष समजत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह सोयीनुसार शिवसेनेशीही सलगी केली. संधी मिळताच मुलग्याला भाजपमध्ये नेवून आमदार केले.
  • ज्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसच्या विचारात वाढल्या, त्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या निवडणूकीत मतदार संघातील भाजपच्या प्रभावाला शरण जावून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व अपक्ष म्हणून निवडून आले. ते आता भाजपच्या सोबत आहेत.
  • माजी खासदार निवेदिता माने यांचे सासरे दिवंगत बाळासाहेब माने हे इचलकरंजीचे पाचवेळा खासदार होते परंतू त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास केला.
  • धनंजय महाडिक यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरु झाली. शिवसेनेनेच त्यांना लोकसभेला पहिल्यांदा संधी दिली. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांची पाच वर्षे कुजवली व नंतर खासदार केले. तिथेही पराभव होताच त्यांनी वारे पाहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.
  • समरजित घाटगे यांचे मुळ घराणे काँग्रेसचे. विक्रमसिंह घाटगे एकदा अपक्ष, नंतर काँग्रेसकडून आमदार झाले. शिवसेनेकडून एक लोकसभा लढवली. परंतू समरजित यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली.
  • माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वत:चा पक्ष असला तरी त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर २०१४ ला त्यांना भाजप बरा वाटला. तिथे भ्रमनिरास झाल्यावर २०१९ ला पुन्हा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आता अजून त्यांचे तळ्यातमळ्यात सुरु आहे.
  • संभाजीराजे यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादीतून सुरु झाली. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. आता ते पुन्हा काँग्रेसच्या सोबत राजकारण करण्याच्या तयारीत आहेत.
  • विनय कोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून आमदार झाले नंतर त्यांनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. आता ते भाजपच्या सोबत आहेत.
  • संजय घाटगे यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरु झाली.त्यानंतर त्यांनी जनता दल, शिवसेना, परत काँग्रेस, परत शिवसेना नंतर स्वाभिमानी व त्यानंतर दोनवेळा शिवसेना अशी फेऱ्या मारल्या. एवढ्या काळात त्यांना जून १९९८ ते ऑक्टोबर १९९९ या काळात दीड वर्षे आमदारकीची संधी मिळाली.
  • उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते परंतू विधानसभेला संघटनेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि आमदार झाले. आता पुन्हा ते संघटनेच्या जवळ आले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण