शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा धरणे भरली

By admin | Updated: August 7, 2014 00:42 IST

पाच धरणे भरण्याच्या मार्गावर : ११ रस्ते अद्याप बंदच, पावसाचा जोर ओसरला

कोल्हापूर : पुढील वर्षभरातील पिण्याच्या, तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर आता पावसाचा जोर हळूहळू ओसरायला लागला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावल्याने नद्यांचे पाणीही कमी होत आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणे तुडुंब भरली असून, अन्य पाच धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११ मार्ग अद्याप पाण्याखाली असून, त्या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. गेल्या १५-२० दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर होता. त्यामुळे नद्या, नाले, ओढे पात्राबाहेर पडून वाहत होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर ओसरत असल्याचे दिसत आहे. आज, बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत केवळ २८.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमुख आगर मानल्या गेलेल्या गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०३ मिलिमीटर पाऊस झाला, तर सर्वांत कमी शिरोळ तालुक्यात १० मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे (क्रमांक ३ व ६) अद्यापही उघडलेले आहेत. या धरणातून ४८०० क्युसेक्स पाणी दर सेकंदाला विसर्ग होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख राधानगरी धरणासह कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे ही धरणे यापूर्वीच भरून वाहत आहेत, तर सर्वांत मोठे धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणासह वारणा, कासारी, कुंभी, पाटगाव ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दूधगंगा ८१ टक्के, वारणा ९२ टक्के, कासारी ९६ टक्के भरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात घट होत असली तरी जिल्ह्यात ११ रस्ते पाण्याखालीच आहेत. भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे, राशिवडे, हळदी, शिरगाव, पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, तसेच कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, आवळे, पुनाळ, तिरपण, वाळोली, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, मांगले, सावर्डे, कोडोली, चावरे, शिरगाव, खोची, दानोळी, वेदगंगा नदीवरील कुरणी, चिखली, बस्तवडे असे १८ बंधारे पाण्याखाली आहेत. (प्रतिनिधी)