शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

इचलकरंजीतील सहा नगरसेवक सेनेच्या गळाला -: आठवड्यात ‘मातोश्री’वर प्रवेशाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:09 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश

ठळक मुद्दे लोकसभेचे पडसाद

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या पवित्र्यात आहेत. आठवड्याभरात हा प्रवेश ‘मातोश्री’वर पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक घडामोडी घडल्या. पूर्वाश्रमीचा माने गट पुन्हा संघटित झाला. शिवसेनेचे धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तब्बल ३५ हजार मताधिक्य मिळाले. साहजिकच निवडणुकीतील या घडामोडीचे परिणाम आता शहरातील आणि पर्यायाने नगरपालिकेतील राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत.

शिवसेनेकडून श्रीमती निवेदिता माने यांनीही लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी शिवसेनेच्याच उमेदवारीवर त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी निवडणूक लढविली आणि त्यांनी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. ही घटना इचलकरंजीच्या नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरली. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेतील सत्तारूढ अगर विरोधी आघाडीमध्ये असलेल्या अनेक नगरसेवकांनी माने यांना या निवडणुकीत मदत केली. त्याचेच परिणाम आता येथील राजकीय गोटामध्ये दिसू लागले आहेत.

माने यांच्यापाठोपाठ शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांपैकी एका प्रमुख नगरसेवकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे, असे ‘त्या’ नगरसेवकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये चार नगरसेवक सत्तारूढ आघाडीतील आहेत. त्यापैकी एकजण पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. तसेच एक नगरसेवक अपक्ष आणि दोन नगरसेवक ‘ताराराणी’चे आहेत. उर्वरित दोघे नगरसेवक शाहू आघाडीतील आहेत. कारण हे दोघे त्यांच्याच पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याने ते माने यांच्याबरोबरीनेच शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छितात, असेही ‘त्या’ नगरसेवकाने स्पष्ट केले. मात्र, या राजकीय घडामोडींबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे.सत्तारूढ आघाडी अबाधितचइचलकरंजी नगरपालिकेमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेसमधील जांभळे गट व ताराराणी आघाडी यांचा समावेश आहे, तर विरोधात कॉँग्रेस व शाहू विकास आघाडी आहे. पालिकेमधील या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरी पालिकेतील सत्तेमध्ये शिवसेना असल्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडी अबाधित राहणार आहे. शिवसेना प्रवेशामुळे सत्तारूढ आघाडीची संख्या दोनने वाढवून ती ३६ होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण