शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

गॅस्ट्रोसदृश साथीबाबत नागरिकांत संभ्रमाची अवस्था

By admin | Updated: November 5, 2014 00:03 IST

मुरगूड ग्रामीण रुग्णालयात २०० जणांवर उपचार : परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय?

अनिल पाटील- मुरगूड -मुरगूड शहराच्या आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गॅस्ट्रोसदृश साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण होते, असा दावा वैद्यकीय अधिकारी करत असले, तर मग परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत असून, नागरिकांत मात्र संभ्रमाची अवस्था आहे.परिसरातील सर्वच गावांतून मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांवर योग्य उपचार झाले असून, अद्यापही नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत ठोस पावले उचलावीत व या साथीला लगाम घालावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीपावली सुरू झाल्यापासून सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, हळदवडे, हळदी, करंजिवणे, दौलतवाडी, चिमगाव, अवचितवाडी, आदी गावांतील जुलाब, उलट्या, अशक्तपणा असणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले होते; पण दिवसेंदिवस या प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषत: यमगे, शिंदेवाडी, सुरुपली, हळदवडे या गावांतील रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामध्ये काही रुग्ण खासगी रुग्णालयातही दाखल झाले होते. हळदवडे गावात, तर चिखली आरोग्य विभागामध्ये कणकण अशीच होती. त्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराचे कारण दूषित पाणी हेच होऊ शकते. पैकी सुरुपली या एका गावालाच फक्त वेदगंगा नदीतून पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. शिंदेवाडीमध्ये तर स्वतंत्र फिल्टर व्यवस्था आहे; पण या गावातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेतच. यमगे गावामध्ये लागण झालेल्या काही रुग्णांपैकी काहीजण नळाचे, तर काहीजण कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरतात. हळदवडेतही विहीर व जॅकवेलमधून पाणी पुरविले जाते. मग एकाच वेळी या सर्व गावांतील पाणी कसे प्रदूषित होईल, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. वेदगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाले असेल, तर या नदीकाठावरील अन्य गावांत मात्र अशा प्रकारचे रुग्ण दिसून येत नाहीत. या सर्व गावांमध्ये पिंपळगाव, चिखली व मुरगूड आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. लोकांना लक्षणे व उपचारांविषयी सर्व ती माहिती दिली आहे. तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात याच लक्षणाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे यावरील सर्व गावांतील पिण्याचे पाणी तपासून घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. बारा वर्षांच्या आठवणी ताज्याबारा वर्षांपूर्वी यमगे गावामध्ये गॅस्ट्रोची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यावेळी १०० ते ४०० जणांना याची लागण झाली होती. त्यामुळे तिघांचा मृत्यूही झाला होता. त्यावेळची परिस्थिती भयावह होती, अशा आठवणी अनेक रुग्णांनी ताज्या केल्या. त्यामुळेच आताच्या या परिस्थितीवर तत्काळ युद्धपातळीवर प्रयत्न करून आळा घालणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.या परिस्थितीत ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून, गार करूनच प्यावे. जास्त थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फराळाचे साहित्य खाण्याचे टाळावे. शक्यतो शेतामध्ये, उन्हामध्ये घरातून नेलेले पाणी पिण्यास वापरावे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, त्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. - डॉ. शामसुंदर सागर,वैद्यकीय अधिकारी, मुरगूड ग्रामीण रुग्णालय