शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

गॅस दाहिनी स्मशानभूमीत दाखल उद्यापासून जोडकाम सुरू ,जानेवारीपासून दाहिनी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

\कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार

कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार आहे. सध्याच्या प्रचलित शेणी व लाकडांच्या पारंपरिक पद्धतीमुळे अंत्यसंस्कारास लागणारा वेळ, होणारे प्रदूषण या गोष्टींचा विचार करून ही गॅसदाहिनी बसविण्यात येत असून, विशेष म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या परंतु व्यवसायाच्या निमित्ताने बडोद्यात स्थायिक झालेल्या राजेंद्र चव्हाण यांनी ही दाहिनी मोफत दिली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही दाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे.कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा स्मशानभूमीत सुविधा कमी पडत आहेत. अपुरे बेड, पार्किंगची गैरसोय यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त अभिजित चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत.गुजरात राज्यात सगळीकडे स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या गेल्या आहेत. राजेंद्र चव्हाण यांचा बडोद्यात गॅस दाहिनी तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास २०० हून अधिक ठिकाणी त्यांनी गॅस दाहिन्या बसविल्या असून त्या उत्तमप्रकारे सुरू आहेत.चव्हाण यांनी अशीच एक गॅस दाहिनी कोल्हापुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सुरुवातील अधिकाºयांकडून तसेच पदाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; परंतु महापौर हसिना फरास, तत्कालिन उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन सादरीकरण पाहिले होते. महापालिका सभेत गॅस दाहिनी बसविण्याचा ठरावही झाला आहे.दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी कोल्हापूरला पाठविली असून ती पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी डिझेल दाहिनी बसविली होती तेथे ठेवण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही गॅस दाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी बडोद्याहून तीन कारगीर येत आहेत. जोडकाम तसेच काही सिव्हील काम करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रीफिकेशनची कामे पूर्ण केली जातील. नवीन वर्षांत ही दाहिनी प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाची : गरजवाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत सुविधांची वाणवा असून, त्यामुळे नागरिकांना अत्यंसंस्कारावेळी वाट पहावी लागते. गॅसची दाहिनी बसविल्यानंतर ही अनेक कामे तातडीने करणे गरजे आहे. स्मशानभूमीत विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे.