शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

गॅस दाहिनी स्मशानभूमीत दाखल उद्यापासून जोडकाम सुरू ,जानेवारीपासून दाहिनी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

\कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार

कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार आहे. सध्याच्या प्रचलित शेणी व लाकडांच्या पारंपरिक पद्धतीमुळे अंत्यसंस्कारास लागणारा वेळ, होणारे प्रदूषण या गोष्टींचा विचार करून ही गॅसदाहिनी बसविण्यात येत असून, विशेष म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या परंतु व्यवसायाच्या निमित्ताने बडोद्यात स्थायिक झालेल्या राजेंद्र चव्हाण यांनी ही दाहिनी मोफत दिली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही दाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे.कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा स्मशानभूमीत सुविधा कमी पडत आहेत. अपुरे बेड, पार्किंगची गैरसोय यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त अभिजित चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत.गुजरात राज्यात सगळीकडे स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या गेल्या आहेत. राजेंद्र चव्हाण यांचा बडोद्यात गॅस दाहिनी तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास २०० हून अधिक ठिकाणी त्यांनी गॅस दाहिन्या बसविल्या असून त्या उत्तमप्रकारे सुरू आहेत.चव्हाण यांनी अशीच एक गॅस दाहिनी कोल्हापुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सुरुवातील अधिकाºयांकडून तसेच पदाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; परंतु महापौर हसिना फरास, तत्कालिन उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन सादरीकरण पाहिले होते. महापालिका सभेत गॅस दाहिनी बसविण्याचा ठरावही झाला आहे.दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी कोल्हापूरला पाठविली असून ती पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी डिझेल दाहिनी बसविली होती तेथे ठेवण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही गॅस दाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी बडोद्याहून तीन कारगीर येत आहेत. जोडकाम तसेच काही सिव्हील काम करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रीफिकेशनची कामे पूर्ण केली जातील. नवीन वर्षांत ही दाहिनी प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाची : गरजवाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत सुविधांची वाणवा असून, त्यामुळे नागरिकांना अत्यंसंस्कारावेळी वाट पहावी लागते. गॅसची दाहिनी बसविल्यानंतर ही अनेक कामे तातडीने करणे गरजे आहे. स्मशानभूमीत विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे.