शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सर आली धावून, बंधारे गेले वाहून

By admin | Updated: June 22, 2014 00:40 IST

धामणी नदीवर मातीच्या बंधाऱ्यांची स्थिती : हजारो टन माती, झाडे, लाखोंचा खर्च वाया

सांगशी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर बांधलेले मातीचे बंधारे पावसाच्या पहिल्या सरीबरोबर वाहून गेले आहेत. बंधाऱ्यांसाठी लागलेली हजारो टन माती, कित्येक झाडे, लाखो रुपयांचा खर्च व शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा या बंधाऱ्यांच्या रूपाने वाहून गेले आहेत.वार्षिक सरासरी ६००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या धामणी परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी धामणी नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. पावसाळा संपताच नदीचे पाणी अडवण्यासाठी मातीच्या बंधाऱ्यांचे नियोजन या परिसरातील शेतकरी करतात. बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरे व खर्चासाठी काटकसरीने केला जातो. या परिसरातील ४० गावांच्या शेतीचा आधार हे माती बंधारे ठरतात. सुमारे २० किलोमीटरच्या नदीपरिसरात तब्बल मातीचे आठ ते दहा बंधारे शेतकरी स्वखर्चाने बांधतात. क्षेत्रनिहाय खर्चाची तरतूद करून हे बंधारे बांधताना परिसरातील पिकाऊ माती, छोटी-मोठी झाडे यांचा वापर करतात. प्रत्येक बंधाऱ्यास सरासरी दोन हजार टन माती, झाडे व लाखभर रुपये खर्चाचा भुर्दंड शेतकरी स्वत: सोसतात. मोबदल्यात साठणाऱ्या पाण्यातून सहा महिने शेतीसाठी पाण्याची सोय करतात. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे मातीचे बंधारेदेखील कोरडे पडतात. खड्डे कोरडे पडल्यावर उरते आशा ती फक्त वळवाच्या व मान्सूनच्या आगमनावर. मान्सूनच्या आगमनाने पाणीटंचाईची समस्या संपते. मात्र, उन्हाळभर आधार ठरलेले मातीचे बंधारे मात्र पुन्हा शेतकऱ्यालाच फोडावे लागतात.गत आठवड्यापासून मान्सूनच्या पडणाऱ्या पावसामुळे आता या परिसरातील शेतकरी हे मातीचे बंधारे फोडण्यात व्यस्त आहेत. (वार्ताहर)