शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सर आली धावून, बंधारे गेले वाहून

By admin | Updated: June 22, 2014 00:40 IST

धामणी नदीवर मातीच्या बंधाऱ्यांची स्थिती : हजारो टन माती, झाडे, लाखोंचा खर्च वाया

सांगशी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर बांधलेले मातीचे बंधारे पावसाच्या पहिल्या सरीबरोबर वाहून गेले आहेत. बंधाऱ्यांसाठी लागलेली हजारो टन माती, कित्येक झाडे, लाखो रुपयांचा खर्च व शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा या बंधाऱ्यांच्या रूपाने वाहून गेले आहेत.वार्षिक सरासरी ६००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या धामणी परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी धामणी नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. पावसाळा संपताच नदीचे पाणी अडवण्यासाठी मातीच्या बंधाऱ्यांचे नियोजन या परिसरातील शेतकरी करतात. बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरे व खर्चासाठी काटकसरीने केला जातो. या परिसरातील ४० गावांच्या शेतीचा आधार हे माती बंधारे ठरतात. सुमारे २० किलोमीटरच्या नदीपरिसरात तब्बल मातीचे आठ ते दहा बंधारे शेतकरी स्वखर्चाने बांधतात. क्षेत्रनिहाय खर्चाची तरतूद करून हे बंधारे बांधताना परिसरातील पिकाऊ माती, छोटी-मोठी झाडे यांचा वापर करतात. प्रत्येक बंधाऱ्यास सरासरी दोन हजार टन माती, झाडे व लाखभर रुपये खर्चाचा भुर्दंड शेतकरी स्वत: सोसतात. मोबदल्यात साठणाऱ्या पाण्यातून सहा महिने शेतीसाठी पाण्याची सोय करतात. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे मातीचे बंधारेदेखील कोरडे पडतात. खड्डे कोरडे पडल्यावर उरते आशा ती फक्त वळवाच्या व मान्सूनच्या आगमनावर. मान्सूनच्या आगमनाने पाणीटंचाईची समस्या संपते. मात्र, उन्हाळभर आधार ठरलेले मातीचे बंधारे मात्र पुन्हा शेतकऱ्यालाच फोडावे लागतात.गत आठवड्यापासून मान्सूनच्या पडणाऱ्या पावसामुळे आता या परिसरातील शेतकरी हे मातीचे बंधारे फोडण्यात व्यस्त आहेत. (वार्ताहर)