शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

सर आली धावून, बंधारे गेले वाहून

By admin | Updated: June 22, 2014 00:40 IST

धामणी नदीवर मातीच्या बंधाऱ्यांची स्थिती : हजारो टन माती, झाडे, लाखोंचा खर्च वाया

सांगशी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर बांधलेले मातीचे बंधारे पावसाच्या पहिल्या सरीबरोबर वाहून गेले आहेत. बंधाऱ्यांसाठी लागलेली हजारो टन माती, कित्येक झाडे, लाखो रुपयांचा खर्च व शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा या बंधाऱ्यांच्या रूपाने वाहून गेले आहेत.वार्षिक सरासरी ६००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या धामणी परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी धामणी नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. पावसाळा संपताच नदीचे पाणी अडवण्यासाठी मातीच्या बंधाऱ्यांचे नियोजन या परिसरातील शेतकरी करतात. बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरे व खर्चासाठी काटकसरीने केला जातो. या परिसरातील ४० गावांच्या शेतीचा आधार हे माती बंधारे ठरतात. सुमारे २० किलोमीटरच्या नदीपरिसरात तब्बल मातीचे आठ ते दहा बंधारे शेतकरी स्वखर्चाने बांधतात. क्षेत्रनिहाय खर्चाची तरतूद करून हे बंधारे बांधताना परिसरातील पिकाऊ माती, छोटी-मोठी झाडे यांचा वापर करतात. प्रत्येक बंधाऱ्यास सरासरी दोन हजार टन माती, झाडे व लाखभर रुपये खर्चाचा भुर्दंड शेतकरी स्वत: सोसतात. मोबदल्यात साठणाऱ्या पाण्यातून सहा महिने शेतीसाठी पाण्याची सोय करतात. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे मातीचे बंधारेदेखील कोरडे पडतात. खड्डे कोरडे पडल्यावर उरते आशा ती फक्त वळवाच्या व मान्सूनच्या आगमनावर. मान्सूनच्या आगमनाने पाणीटंचाईची समस्या संपते. मात्र, उन्हाळभर आधार ठरलेले मातीचे बंधारे मात्र पुन्हा शेतकऱ्यालाच फोडावे लागतात.गत आठवड्यापासून मान्सूनच्या पडणाऱ्या पावसामुळे आता या परिसरातील शेतकरी हे मातीचे बंधारे फोडण्यात व्यस्त आहेत. (वार्ताहर)