शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:28 IST

गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

ठळक मुद्दे हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांना दिलासा;  वनविभागाचा वरिष्ठस्तरावर प्रस्ताव 

सिंधुदुर्ग : गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

या पकडलेल्या हत्तींना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात सोडून त्या ठिकाणच्या बंदिस्त जागेत त्यांना माणसाळविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने वरिष्ठ स्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिलारीतील हत्ती उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि पर्यायाने कोकणला हत्ती हा प्राणी दुर्मीळच! मात्र सन २००२ मध्ये कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सिंधुुदुर्गात हत्तींचे कुतूहल कमी झाले. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे प्रथम हत्तींनी प्रवेश केला आणि तेथूनच हत्तींचा प्रवास सुरू झाला.

भातशेती, केळी, पोफळी, माड बागायतींचे दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करीत या हत्तींनी थेट जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ओरोस गाठले आणि हत्ती उपद्रवाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसली.त्यानंतर पर्यटकांनाही हे हत्ती पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा एलिफंट कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरेल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून, मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.पकडलेल्या हत्तींना माणसाळविण्यासाठी आजराच का? तेथील जमीन निश्चित करण्यामागचे कारण काय? याबाबत पुराणिक यांना विचारले असता त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली. हत्तींना थंड वातावरण, सपाट-विस्तीर्ण जागा आवश्यक असते, जी आजऱ्यात उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी तिलारीचा परिसर नैसर्गिक अधिवास होऊ शकत नाही.

तिलारीतील वातावरण उष्ण आहे. शिवाय जमीनही सपाट नाही. त्यामुळे हत्तींना माणसाळविण्यासाठी आजऱ्याचा परिसर आणि वातावरण पोषक आहे. शिवाय हत्तींचा लोकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.मंत्र्यांकडून पाठपुरावापालकमंत्री दीपक केसरकर हत्ती प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत. त्यांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी वनविभागाची योजना चांगली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. लवकर हत्तींना पकडून माणसाळविण्यात येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग