शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिपाईच चालवतोय चंदगड भूमिअभिलेखचा कारभार

By admin | Updated: March 9, 2015 23:57 IST

अतिरिक्त कार्यभार पन्हाळा उपअधीक्षकांकडे : आठ महिन्यांंपासून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा; तब्बल १३ पदे रिक्त

नंदकुमार ढेरे - चंदगड -येथील भूमिअभिलेख कार्यालयात आठ महिन्यांपासून उपअधीक्षक, मंजूर १६ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षकांकडे. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याने शिपाईच कार्यालय चालवीत आहे. कार्यालयाकडे आपल्या प्रलंबित कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यालयाकडे केवळ वायफळ फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे एकूण १६ पदे मंजूर आहेत. याठिकाणी उपअधीक्षक असलेले एन. एस. दोशी हे १६ आॅगस्ट २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आठ महिने हे पद रिक्त आहे. निमतानदार १, भूकरमापक ३, प्रतिलिपिक १, नगर भूकरमापक लिपिक १, दुरुस्ती लिपिक १, आवक-जावक १, छाननी लिपिक १, अभिलेखापाल १, दफ्तरबंद १, शिपाई ३ व मुख्यालय सहायक १ अशी १६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या या कार्यालयाकडे मुख्यालय सहायक १, शिपाई १, लिपिक १, भूकरमापक १ असे ४ कर्मचारी कामावर आहेत. त्यापैकी शिरोळ तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बदलून आलेले भूकरमापक हे दोन महिन्यांपासून दीर्घ रजेवर आहेत. मुख्यालय सहायक असलेले राणे यांना कार्यालयीन मिटिंग व इतर कामांसाठी गडहिंग्लज, कोल्हापूर येथे वारंवार जावे लागत असल्याने कार्यालय चालविण्याची वेळ शिपायावर येत आहे.सध्या या कार्यालयाकडे तालुक्यातील जमीन मोजणीची ९० प्रकरणे, वारसा नोंदी, कमी-जास्त पत्रक, कब्जा, कोर्ट कमिशन, आदी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय जुने ७/१२, ८ अ, वारसा नोंद, प्रॉपर्टी कार्ड यांची माहिती विचारण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या सर्वांना लिपिक व शिपाई यांना तोंड द्यावे लागत आहे.या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे डुक्करवाडी येथील रवींद्र देशपांडे, हेमंत देशपांडे या शेतकऱ्यांची डिसेंबर २०१३ मधील मोजणी अद्याप खोळंबली आहे. शेती मोकळी असल्याने शेतकरी लवकर मोजणी करून घेण्यासाठी या कार्यालयाकडे दररोज फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना नेहमीचीच उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे यांच्याकडे आहे. १५ दिवसांतून एकदाच शिरकोळी यांची या कार्यालयाला भेट होते. पन्हाळ््यावरून चंदगडला येण्यासाठी दोन वाजतात. दोन वाजता कार्यालयात आल्यानंतर फक्त सह्या करून पुन्हा लगेच त्या माघारी जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यभार शेतकऱ्यांच्या दृष्टीने असून नसल्यासारखा आहे. शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेशेतकऱ्यांसह नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारीच नाहीत ही बाब खेदजनक आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी चंदगडचा तात्पुरता कार्यभार गडहिंग्लज येथील अधिकाऱ्यांऐवजी पन्हाळा उपअधीक्षकांकडे देण्यामागचे गौडबंगाल काय आहे, हे मात्र समजले नाही.