शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

शिपाईच चालवतोय चंदगड भूमिअभिलेखचा कारभार

By admin | Updated: March 9, 2015 23:57 IST

अतिरिक्त कार्यभार पन्हाळा उपअधीक्षकांकडे : आठ महिन्यांंपासून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा; तब्बल १३ पदे रिक्त

नंदकुमार ढेरे - चंदगड -येथील भूमिअभिलेख कार्यालयात आठ महिन्यांपासून उपअधीक्षक, मंजूर १६ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षकांकडे. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याने शिपाईच कार्यालय चालवीत आहे. कार्यालयाकडे आपल्या प्रलंबित कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यालयाकडे केवळ वायफळ फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे एकूण १६ पदे मंजूर आहेत. याठिकाणी उपअधीक्षक असलेले एन. एस. दोशी हे १६ आॅगस्ट २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आठ महिने हे पद रिक्त आहे. निमतानदार १, भूकरमापक ३, प्रतिलिपिक १, नगर भूकरमापक लिपिक १, दुरुस्ती लिपिक १, आवक-जावक १, छाननी लिपिक १, अभिलेखापाल १, दफ्तरबंद १, शिपाई ३ व मुख्यालय सहायक १ अशी १६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या या कार्यालयाकडे मुख्यालय सहायक १, शिपाई १, लिपिक १, भूकरमापक १ असे ४ कर्मचारी कामावर आहेत. त्यापैकी शिरोळ तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बदलून आलेले भूकरमापक हे दोन महिन्यांपासून दीर्घ रजेवर आहेत. मुख्यालय सहायक असलेले राणे यांना कार्यालयीन मिटिंग व इतर कामांसाठी गडहिंग्लज, कोल्हापूर येथे वारंवार जावे लागत असल्याने कार्यालय चालविण्याची वेळ शिपायावर येत आहे.सध्या या कार्यालयाकडे तालुक्यातील जमीन मोजणीची ९० प्रकरणे, वारसा नोंदी, कमी-जास्त पत्रक, कब्जा, कोर्ट कमिशन, आदी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय जुने ७/१२, ८ अ, वारसा नोंद, प्रॉपर्टी कार्ड यांची माहिती विचारण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या सर्वांना लिपिक व शिपाई यांना तोंड द्यावे लागत आहे.या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे डुक्करवाडी येथील रवींद्र देशपांडे, हेमंत देशपांडे या शेतकऱ्यांची डिसेंबर २०१३ मधील मोजणी अद्याप खोळंबली आहे. शेती मोकळी असल्याने शेतकरी लवकर मोजणी करून घेण्यासाठी या कार्यालयाकडे दररोज फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना नेहमीचीच उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे यांच्याकडे आहे. १५ दिवसांतून एकदाच शिरकोळी यांची या कार्यालयाला भेट होते. पन्हाळ््यावरून चंदगडला येण्यासाठी दोन वाजतात. दोन वाजता कार्यालयात आल्यानंतर फक्त सह्या करून पुन्हा लगेच त्या माघारी जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यभार शेतकऱ्यांच्या दृष्टीने असून नसल्यासारखा आहे. शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेशेतकऱ्यांसह नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारीच नाहीत ही बाब खेदजनक आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी चंदगडचा तात्पुरता कार्यभार गडहिंग्लज येथील अधिकाऱ्यांऐवजी पन्हाळा उपअधीक्षकांकडे देण्यामागचे गौडबंगाल काय आहे, हे मात्र समजले नाही.