शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा खुर्ची सोडा : सुकाणू समिती नेत्यांचा इशारा

By admin | Updated: June 7, 2017 16:27 IST

दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ : संपतराव पवार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फुट पाडत असून सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा. असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढ असून शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सर्वपक्षीय सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. दहन करण्यासाठी पुतळा घेऊन येतानाच पोलीसांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक परिसर दणाणून गेला. आंदोलन कर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

संपुर्ण राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे, त्यामुळे आंदोलनात फुट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहेरी असल्यासारखे वागत आहे. पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलीसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशारा संपतराव पवार यांनी दिला.

‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणूकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची ही भाजपची जुनी पध्दत आहे. सरकारच्या दडपशाही खपवून घेणार नसून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाहीतर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल.

यावेळी उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदलकर, गिरीष फोंडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने प्रामाणितकता सिध्द करावी

शिवसेना व भाजप मध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठींबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिध्द करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.