शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा खुर्ची सोडा : सुकाणू समिती नेत्यांचा इशारा

By admin | Updated: June 7, 2017 16:27 IST

दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ : संपतराव पवार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फुट पाडत असून सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा. असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढ असून शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सर्वपक्षीय सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. दहन करण्यासाठी पुतळा घेऊन येतानाच पोलीसांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक परिसर दणाणून गेला. आंदोलन कर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

संपुर्ण राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे, त्यामुळे आंदोलनात फुट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहेरी असल्यासारखे वागत आहे. पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलीसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशारा संपतराव पवार यांनी दिला.

‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणूकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची ही भाजपची जुनी पध्दत आहे. सरकारच्या दडपशाही खपवून घेणार नसून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाहीतर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल.

यावेळी उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदलकर, गिरीष फोंडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने प्रामाणितकता सिध्द करावी

शिवसेना व भाजप मध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठींबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिध्द करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.