शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत मजुरीवाढीवरून पुन्हा संघर्षाची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सन २०१३ चा करार रद्द करावा व आताच्या परिस्थितीनुसार नवीन धोरण ठरवावे, ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : सन २०१३ चा करार रद्द करावा व आताच्या परिस्थितीनुसार नवीन धोरण ठरवावे, अशी मागणी यंत्रमागधारक संघटनांची आहे, तर गेल्या तीन वर्षांपासून घोषणा होऊनही मजुरीवाढ दिली जात नसल्याने आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नियमानुसार मजुरीवाढ मिळालीच पाहिजे, अशी मागणी कामगार संघटनांची आहे. परिणामी वस्त्रोद्योगात मजुरीवाढीवरून पुन्हा संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सन २०१३ ला झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहात यंत्रमागधारक व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संयुक्त करार केला होता. त्यामध्ये दरवर्षी शासनाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याला एकत्र करून त्याचे पीस रेटवर रूपांतरित करून त्यानुसार यंत्रमागधारकांनी कामगारांना मजुरीवाढ द्यावी. त्याचबरोबर त्या तुलनेत ट्रेडिंगधारकांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांनाही मजुरीवाढ द्यावी, असे ठरले होते.

सन २०१३ पूर्वी दर तीन वर्षाला त्यावेळच्या परिस्थितीनुसार मजुरीवाढ निश्चित केली जात होती; परंतु प्रत्येकवेळी आंदोलन, चर्चा, आरोप-प्रत्यारोपामुळे येथील वस्त्रोद्योगाची हानी होत होती. बाहेरच्या बाजारपेठांमध्ये येथील उत्पादनाबाबत शाश्वती नसायची. त्यामुळे या वारंवारच्या आंदोलनाला फाटा देण्यासाठी त्यावेळी वरीलप्रमाणे करार करण्यात आला होता. त्यानुसार सन २०१८ पर्यंत सुरळीतपणे चालले; परंतु गेल्या चार-पाच वर्षांत वस्त्रोद्योगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली. त्यामुळे व्यवसाय कोलमडू लागला आणि कामगारांच्या मजुरीवाढीच्या अंमलबजावणीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे संघर्ष निर्माण होण्याआधीच शासन व प्रशासनाने योग्य तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

उत्पादन खर्चात होते तफावत

राज्यातील इचलकरंजी वगळता अन्य कोणत्याच वस्त्रोद्योगाच्या ठिकाणी अशा स्वरूपाची मजुरीवाढ नाही. परिणामी त्यांच्या व इथल्या उत्पादन खर्चात तफावत निर्माण होते. त्याचा फटका पर्यायाने इथल्या वस्त्रोद्योगालाच बसतो.

प्रतिक्रिया

करारावेळची परिस्थिती आता राहिली नाही. त्यामुळे तो करार रद्दबातल ठरवून नवीन धोरण ठरवावे; अन्यथा हा व्यवसाय कोलमडून पडेल. याबाबत यंत्रमागधारक संघटनांकडून सहायक कामगार आयुक्तांना प्रत्येकवेळी पत्र दिले आहे.

विनय महाजन, यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधी

इंधन दरवाढीसह सर्वच प्रकारची महागाई वाढल्याने कामगारांना जगणे मुश्कील होत आहे. त्यामुळे मजुरीवाढ मिळालीच पाहिजे, त्यासाठी शासकीय स्तरावर बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी कामगार संघटनांची आहे.

दत्ता माने, कामगार संघटना प्रतिनिधी