शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: April 22, 2016 00:47 IST

शिरोळ सीमा भाग : बारमाही वाहणाऱ्या चार नद्या असूनही तालुक्याला दुष्काळाची झळ

गणपती कोळी -- कुरुंदवाड -शिरोळ तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे पाण्याबाबत राज्यात सुखी तालुका मानला जातो़ मात्र, राज्यातील दुष्काळाची झळ या तालुक्यालाही सोसावी लागत असून, नद्या कोरड्या पडू लागल्याने शेतातील पिके वाळत आहेत़ कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने बंधाऱ्याच्या पूर्व भागातील तालुक्याच्या तसेच चिकोडी, अथणी तालुक्यांतील नद्या कोरड्या पडल्या असून, या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़ श्रिोळ तालुक्यातून कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे पाण्याची कमतरता कधीच भासली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व न समजल्याने शेतीच्या अतिरिक्त पाण्यामुळे पिकेही तहान विसरून गेली़ गतवर्षी झालेला अत्यल्प पाऊस व त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा हिवाळ्यापासूनच नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ अन् पाणीटंचाईची जाणीव शेतकरी, नागरिकांना होऊ लागली़धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने किमान पाणी वापरता यावा यासाठी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी काहीकाळ उपसाबंदी चालू केली आहे़ पिकांना गरजेपूर्वीच पाणी देण्याची सवय लागलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पाणी महिना दीड महिना लांबल्याने पिके वाळू लागली आहेत़ या भागातील शेतकऱ्यांची शेतीवरच आर्थिक उलाढाल असल्याने व पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल होऊ लागली आहे़पंचगंगा नदीवर इचलकरंजी बंधाऱ्याला घालण्यात आलेले बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना इचलकरंजी लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे या नदीवरील शिरोळ बंधाऱ्यापर्यंत असलेल्या सुमारे पंचवीसहून अधिक गावांतून संताप व्यक्त करून तोडफोडीचा इशाराही देण्यात आला़कृष्णा नदीवर राजापूर येथे महाराष्ट्र हद्दीतील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्याला बरगे घालून फुगट्याद्वारे तालुक्यातील शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या सुमारे पंचवीस गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यात ठराविक उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी बंधाऱ्याच्या पूर्व भागातील नदीत सोडून कर्नाटकाला दिले जाते़यंदा पाणीपातळी खालावल्याने व बंधाऱ्यातील गळती थांबविल्याने कर्नाटकातील चिकोडी, अथणी तालुक्यांतील नदी कोरडी पडली आहे़ चार दिवसांपूर्वी दुधगंगा नदीतून एक टी़एम़सी़ पाणी सोडल्यामुळे तात्पुरते जीवदान मिळाले आहे़ मात्र, पुन्हा नदी कोरडी पडणार असून कर्नाटकातील लोक राजापूर बंधाऱ्यावर लक्ष्य साधणार आहेत. २००३ साली अशाच पाणी समस्येतून रात्रीतून जे़ सी़ बी़यंत्राच्या साहाय्याने कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढून पाणी सोडले होते़ तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून पाण्याविना पिके वाळू लागल्याने संतापाचा उद्रेक केव्हाही होऊन पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे़ राजापूर बंधाऱ्याचे नियंत्रण सांगली पाटबंधारा विभागाकडे असून याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे़ वाळू उपसामुळे पाणी प्रश्न गंभीरराजापूर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी खिद्रापूर गावाला वळसा घालून राजापूरवाडी, टाकळीपर्यंत जाते़ मात्र खिद्रापूर येथे दुधगंगा नदीतून कर्नाटक हद्दीतील वाळू उपसा केल्याने व नदीपात्र उथळ झाल्याने कृष्णा नदीतील पाणी कर्नाटकाच्या दिशेने जाते़ याचा परिणाम खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी गावाला बसत असून नदी कोरडी पडल्याने टाकळी येथे गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यामुळे पिके तर वाळू लागली आहेत़ पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे़