शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: April 22, 2016 00:47 IST

शिरोळ सीमा भाग : बारमाही वाहणाऱ्या चार नद्या असूनही तालुक्याला दुष्काळाची झळ

गणपती कोळी -- कुरुंदवाड -शिरोळ तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे पाण्याबाबत राज्यात सुखी तालुका मानला जातो़ मात्र, राज्यातील दुष्काळाची झळ या तालुक्यालाही सोसावी लागत असून, नद्या कोरड्या पडू लागल्याने शेतातील पिके वाळत आहेत़ कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने बंधाऱ्याच्या पूर्व भागातील तालुक्याच्या तसेच चिकोडी, अथणी तालुक्यांतील नद्या कोरड्या पडल्या असून, या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़ श्रिोळ तालुक्यातून कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे पाण्याची कमतरता कधीच भासली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व न समजल्याने शेतीच्या अतिरिक्त पाण्यामुळे पिकेही तहान विसरून गेली़ गतवर्षी झालेला अत्यल्प पाऊस व त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा हिवाळ्यापासूनच नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ अन् पाणीटंचाईची जाणीव शेतकरी, नागरिकांना होऊ लागली़धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने किमान पाणी वापरता यावा यासाठी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी काहीकाळ उपसाबंदी चालू केली आहे़ पिकांना गरजेपूर्वीच पाणी देण्याची सवय लागलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पाणी महिना दीड महिना लांबल्याने पिके वाळू लागली आहेत़ या भागातील शेतकऱ्यांची शेतीवरच आर्थिक उलाढाल असल्याने व पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल होऊ लागली आहे़पंचगंगा नदीवर इचलकरंजी बंधाऱ्याला घालण्यात आलेले बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना इचलकरंजी लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे या नदीवरील शिरोळ बंधाऱ्यापर्यंत असलेल्या सुमारे पंचवीसहून अधिक गावांतून संताप व्यक्त करून तोडफोडीचा इशाराही देण्यात आला़कृष्णा नदीवर राजापूर येथे महाराष्ट्र हद्दीतील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्याला बरगे घालून फुगट्याद्वारे तालुक्यातील शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या सुमारे पंचवीस गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यात ठराविक उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी बंधाऱ्याच्या पूर्व भागातील नदीत सोडून कर्नाटकाला दिले जाते़यंदा पाणीपातळी खालावल्याने व बंधाऱ्यातील गळती थांबविल्याने कर्नाटकातील चिकोडी, अथणी तालुक्यांतील नदी कोरडी पडली आहे़ चार दिवसांपूर्वी दुधगंगा नदीतून एक टी़एम़सी़ पाणी सोडल्यामुळे तात्पुरते जीवदान मिळाले आहे़ मात्र, पुन्हा नदी कोरडी पडणार असून कर्नाटकातील लोक राजापूर बंधाऱ्यावर लक्ष्य साधणार आहेत. २००३ साली अशाच पाणी समस्येतून रात्रीतून जे़ सी़ बी़यंत्राच्या साहाय्याने कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढून पाणी सोडले होते़ तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून पाण्याविना पिके वाळू लागल्याने संतापाचा उद्रेक केव्हाही होऊन पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे़ राजापूर बंधाऱ्याचे नियंत्रण सांगली पाटबंधारा विभागाकडे असून याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे़ वाळू उपसामुळे पाणी प्रश्न गंभीरराजापूर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी खिद्रापूर गावाला वळसा घालून राजापूरवाडी, टाकळीपर्यंत जाते़ मात्र खिद्रापूर येथे दुधगंगा नदीतून कर्नाटक हद्दीतील वाळू उपसा केल्याने व नदीपात्र उथळ झाल्याने कृष्णा नदीतील पाणी कर्नाटकाच्या दिशेने जाते़ याचा परिणाम खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी गावाला बसत असून नदी कोरडी पडल्याने टाकळी येथे गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यामुळे पिके तर वाळू लागली आहेत़ पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे़