शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: April 22, 2016 00:47 IST

शिरोळ सीमा भाग : बारमाही वाहणाऱ्या चार नद्या असूनही तालुक्याला दुष्काळाची झळ

गणपती कोळी -- कुरुंदवाड -शिरोळ तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे पाण्याबाबत राज्यात सुखी तालुका मानला जातो़ मात्र, राज्यातील दुष्काळाची झळ या तालुक्यालाही सोसावी लागत असून, नद्या कोरड्या पडू लागल्याने शेतातील पिके वाळत आहेत़ कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने बंधाऱ्याच्या पूर्व भागातील तालुक्याच्या तसेच चिकोडी, अथणी तालुक्यांतील नद्या कोरड्या पडल्या असून, या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़ श्रिोळ तालुक्यातून कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे पाण्याची कमतरता कधीच भासली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व न समजल्याने शेतीच्या अतिरिक्त पाण्यामुळे पिकेही तहान विसरून गेली़ गतवर्षी झालेला अत्यल्प पाऊस व त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने यंदा हिवाळ्यापासूनच नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ अन् पाणीटंचाईची जाणीव शेतकरी, नागरिकांना होऊ लागली़धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने किमान पाणी वापरता यावा यासाठी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी काहीकाळ उपसाबंदी चालू केली आहे़ पिकांना गरजेपूर्वीच पाणी देण्याची सवय लागलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे पाणी महिना दीड महिना लांबल्याने पिके वाळू लागली आहेत़ या भागातील शेतकऱ्यांची शेतीवरच आर्थिक उलाढाल असल्याने व पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल होऊ लागली आहे़पंचगंगा नदीवर इचलकरंजी बंधाऱ्याला घालण्यात आलेले बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना इचलकरंजी लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे या नदीवरील शिरोळ बंधाऱ्यापर्यंत असलेल्या सुमारे पंचवीसहून अधिक गावांतून संताप व्यक्त करून तोडफोडीचा इशाराही देण्यात आला़कृष्णा नदीवर राजापूर येथे महाराष्ट्र हद्दीतील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्याला बरगे घालून फुगट्याद्वारे तालुक्यातील शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या सुमारे पंचवीस गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यात ठराविक उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी बंधाऱ्याच्या पूर्व भागातील नदीत सोडून कर्नाटकाला दिले जाते़यंदा पाणीपातळी खालावल्याने व बंधाऱ्यातील गळती थांबविल्याने कर्नाटकातील चिकोडी, अथणी तालुक्यांतील नदी कोरडी पडली आहे़ चार दिवसांपूर्वी दुधगंगा नदीतून एक टी़एम़सी़ पाणी सोडल्यामुळे तात्पुरते जीवदान मिळाले आहे़ मात्र, पुन्हा नदी कोरडी पडणार असून कर्नाटकातील लोक राजापूर बंधाऱ्यावर लक्ष्य साधणार आहेत. २००३ साली अशाच पाणी समस्येतून रात्रीतून जे़ सी़ बी़यंत्राच्या साहाय्याने कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढून पाणी सोडले होते़ तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून पाण्याविना पिके वाळू लागल्याने संतापाचा उद्रेक केव्हाही होऊन पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे़ राजापूर बंधाऱ्याचे नियंत्रण सांगली पाटबंधारा विभागाकडे असून याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे़ वाळू उपसामुळे पाणी प्रश्न गंभीरराजापूर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी खिद्रापूर गावाला वळसा घालून राजापूरवाडी, टाकळीपर्यंत जाते़ मात्र खिद्रापूर येथे दुधगंगा नदीतून कर्नाटक हद्दीतील वाळू उपसा केल्याने व नदीपात्र उथळ झाल्याने कृष्णा नदीतील पाणी कर्नाटकाच्या दिशेने जाते़ याचा परिणाम खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी गावाला बसत असून नदी कोरडी पडल्याने टाकळी येथे गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यामुळे पिके तर वाळू लागली आहेत़ पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे़