शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना 'अच्छे दिन' येण्याचे संकेत

By admin | Updated: June 13, 2016 00:50 IST

वाहन उद्योग तेजीत : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कामाच्या आॅर्डरी, नामवंत कंपन्यांच्या उत्पादनात वाढ

सतीश पाटील--  शिरोली -जागतिक मंदीचे सावट कमी होत असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगविश्वाला देखील होण्याची चिन्हे आहेत. पुढील सहा महिन्यांत जिल्ह्यासह परिसरातील उद्योगांना अच्छे दिन येणार असून सध्या अनेक उद्योगांकडे कामाच्या आॅर्डर वाढत आहेत.आॅक्टोबर २०१३ पासून औद्योगिक मंदीला सुरुवात झाली होती. मंदीचे मुख्य कारण म्हणजे तयार होणाऱ्या गाड्यांची विक्री कमी झाली होती. कमी पाऊस, जागतिक पातळीवर थंडावलेली उलाढाल याचा फटका आॅटोमोबाईल क्षेत्राला बसत होता. ही परिस्थिती गेली तीन वर्षे कायम होती. जगातील मोठमोठ्या कंपन्यांना मंदीचा फटका बसला आहे, तर देशातील मोठ्या कंपन्याही यातून सुटलेल्या नाहीत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राची इंडस्ट्रीज तर पूर्णपणे महिंद्रा, टाटा, जॉनडीअर, न्यूहॉलंड या आॅटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहे.महिंद्रा कंपनीचे ४० टक्के, तर टाटा या कंपन्यांचे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते, तर इतर कंपन्यांचे उत्पादनही ५० टक्केपर्यंत घटले होते. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजवर अवलंबून असलेला फौंड्री उद्योग आणि इतर पूरक उद्योगांना मंदीची मोठी झळ पोहोचली. मार्च २०१६ नंतर मात्र मंदी कमी होऊन उत्पादन वाढत आहे. अनेक कंपन्यांना आॅर्डर वाढून आल्या आहेत. महिंद्रा कंपनीचे ४० टक्के कमी झालेले उत्पादन पुन्हा वाढले आहे. टाटा कंपनीच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अडचण होती, त्यामुळे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते; पण आता महिंद्रा ट्रॅक्टर आणि टाटा ट्रक प्लँटला चांगल्या आॅर्डर आहेत. तसेच हवामान खात्याने चालू वर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. परिणामी बाजारपेठ सुधारत आहे. युरोपातील इटली, जर्मनी, तुर्की या देशात निर्यात चांगली वाढली आहे. कोल्हापूरमधील बऱ्याच कंपन्यांना २०२१ पर्यंतच्या मोठ्या आॅर्डर मिळाल्या आहेत. जॉनडीअर, न्यू हॉलंड या सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे पन्नास टक्के लघु आणि मध्यम उद्योग बंद होते. परिणामी कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला घरघर लागली होती. मंदीची झळ उद्योजकांबरोबरच कामगार वर्गालासुद्धा बसली होती. पंधरा-पंधरा दिवस कामगारांना सुटी देण्यात आल्या होत्या. कामगारांना कुटुंब चालविणे अवघड झाले होते. मंदी हटणार कधी हे कुणालाच माहीत नव्हते. अशीच परिस्थिती राहिली असती तर पश्चिम महाराष्ट्रात उद्योग होते असे म्हणण्याची वेळ आली असती; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उद्योगांना काम वाढले असून एक्स्पोर्ट वाढला आहे. पुढील वर्षभरात स्थानिक उद्योग पूर्ण क्षमतेने चालतील, अशी उद्योजकांना आशा आहे.कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग वाढण्यासाठी राज्य शासनाने सर्वांत प्रथम धोरण बदलले पाहिजे. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग आणला पाहिजे. विदर्भात मिहानला टाटा आॅटोमोटिव्ह, एल अँड टीचे मोठे प्रोजेक्ट आहेत. पुणे, चाकण, कोकणात रायगड याठिकाणी नवीन कंपन्या आल्या आहेत. मग कोल्हापूरला का नाही? व्याजदर कमी केले पाहिजेत, टॅक्समध्ये सवलती दिल्या पाहिजेत, अशी उद्योजकांची मागणी आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी उद्योजकांची मागणी आहे.