शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

उद्योगांना 'अच्छे दिन' येण्याचे संकेत

By admin | Updated: June 13, 2016 00:50 IST

वाहन उद्योग तेजीत : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कामाच्या आॅर्डरी, नामवंत कंपन्यांच्या उत्पादनात वाढ

सतीश पाटील--  शिरोली -जागतिक मंदीचे सावट कमी होत असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगविश्वाला देखील होण्याची चिन्हे आहेत. पुढील सहा महिन्यांत जिल्ह्यासह परिसरातील उद्योगांना अच्छे दिन येणार असून सध्या अनेक उद्योगांकडे कामाच्या आॅर्डर वाढत आहेत.आॅक्टोबर २०१३ पासून औद्योगिक मंदीला सुरुवात झाली होती. मंदीचे मुख्य कारण म्हणजे तयार होणाऱ्या गाड्यांची विक्री कमी झाली होती. कमी पाऊस, जागतिक पातळीवर थंडावलेली उलाढाल याचा फटका आॅटोमोबाईल क्षेत्राला बसत होता. ही परिस्थिती गेली तीन वर्षे कायम होती. जगातील मोठमोठ्या कंपन्यांना मंदीचा फटका बसला आहे, तर देशातील मोठ्या कंपन्याही यातून सुटलेल्या नाहीत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राची इंडस्ट्रीज तर पूर्णपणे महिंद्रा, टाटा, जॉनडीअर, न्यूहॉलंड या आॅटोमोबाईल कंपन्यांवर अवलंबून आहे.महिंद्रा कंपनीचे ४० टक्के, तर टाटा या कंपन्यांचे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते, तर इतर कंपन्यांचे उत्पादनही ५० टक्केपर्यंत घटले होते. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजवर अवलंबून असलेला फौंड्री उद्योग आणि इतर पूरक उद्योगांना मंदीची मोठी झळ पोहोचली. मार्च २०१६ नंतर मात्र मंदी कमी होऊन उत्पादन वाढत आहे. अनेक कंपन्यांना आॅर्डर वाढून आल्या आहेत. महिंद्रा कंपनीचे ४० टक्के कमी झालेले उत्पादन पुन्हा वाढले आहे. टाटा कंपनीच्या प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अडचण होती, त्यामुळे ३० टक्के उत्पादन कमी झाले होते; पण आता महिंद्रा ट्रॅक्टर आणि टाटा ट्रक प्लँटला चांगल्या आॅर्डर आहेत. तसेच हवामान खात्याने चालू वर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. परिणामी बाजारपेठ सुधारत आहे. युरोपातील इटली, जर्मनी, तुर्की या देशात निर्यात चांगली वाढली आहे. कोल्हापूरमधील बऱ्याच कंपन्यांना २०२१ पर्यंतच्या मोठ्या आॅर्डर मिळाल्या आहेत. जॉनडीअर, न्यू हॉलंड या सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे पन्नास टक्के लघु आणि मध्यम उद्योग बंद होते. परिणामी कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला घरघर लागली होती. मंदीची झळ उद्योजकांबरोबरच कामगार वर्गालासुद्धा बसली होती. पंधरा-पंधरा दिवस कामगारांना सुटी देण्यात आल्या होत्या. कामगारांना कुटुंब चालविणे अवघड झाले होते. मंदी हटणार कधी हे कुणालाच माहीत नव्हते. अशीच परिस्थिती राहिली असती तर पश्चिम महाराष्ट्रात उद्योग होते असे म्हणण्याची वेळ आली असती; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उद्योगांना काम वाढले असून एक्स्पोर्ट वाढला आहे. पुढील वर्षभरात स्थानिक उद्योग पूर्ण क्षमतेने चालतील, अशी उद्योजकांना आशा आहे.कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग वाढण्यासाठी राज्य शासनाने सर्वांत प्रथम धोरण बदलले पाहिजे. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग आणला पाहिजे. विदर्भात मिहानला टाटा आॅटोमोटिव्ह, एल अँड टीचे मोठे प्रोजेक्ट आहेत. पुणे, चाकण, कोकणात रायगड याठिकाणी नवीन कंपन्या आल्या आहेत. मग कोल्हापूरला का नाही? व्याजदर कमी केले पाहिजेत, टॅक्समध्ये सवलती दिल्या पाहिजेत, अशी उद्योजकांची मागणी आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी उद्योजकांची मागणी आहे.