शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

त्रुटी दाखवा; राजकीय भांडवल कशासाठी? : अरुण नरके ,पन्हाळा-गगनबावड्यात उत्पादकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:39 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यासाठी त्रुटी दाखविणाºयाचे स्वागत केले पाहिजे; पण त्याचे राजकीय भांडवल केले तर ते संस्थेसाठी घातक असते.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यासाठी त्रुटी दाखविणाºयाचे स्वागत केले पाहिजे; पण त्याचे राजकीय भांडवल केले तर ते संस्थेसाठी घातक असते. ‘गोकुळ’बाबत सध्या हेच सुरू असून, सतेज पाटील यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे; पण त्यांचा त्यामागील उद्देश चुकीचा असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शनिवारी केले.

‘गोकुळ’च्या वतीने गुरुवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार असून, त्याच्या नियोजनासाठी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील दूध उत्पादक शेतकºयांची बैठक कोल्हापुरात झाली. त्यामध्ये त्यांनी परखड भूमिका मांडली. नरके म्हणाले, जगभरात गाईच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर दबाव आणणे संयुक्तिक असताना त्याचे राजकीय भांडवल केले जाते, हे उत्पादकांच्या दृष्टीने घातक आहे.

नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आपणाला रस नसून यातून ‘गोकुळ’ला दगाफटका बसू नये. संघाच्या कारभाराबाबत काही त्रुटी असतीलही, त्या दाखवाव्यात आणि संचालकांनी त्यामध्ये सुधारणाही केल्या पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. सतेज पाटील यांना त्रुटी दाखविण्याचा आणि दरवाढ मागण्याचा हक्क आहे. त्यांनी माहिती मागितली आणि ती दिली नसेल तर त्यांनी पुढचे पाऊल उचलावे. सर्वच बाबतींत सर्वसाधारण सभेचे भांडवल करून आगपाखड करणे योग्य नाही.

दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, पावडर खरेदी करावी, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नरके यांनी केले. याप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास जाधव, डी. जी. पाटील, शामराव पाटील, अंबाजी पाटील, आबा रामा पाटील, एम. जे. पाटील, तानाजी पाटील, आदी उपस्थित होते.सगळे ‘गोकुळ’च बाद कसे?एवढा मोठा डोलारा हाताळताना काही चुका होत जातात. प्रशासन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यावरून सगळे ‘गोकुळ’च बाद असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे नरके यांनी सांगितले.साहेब, तटस्थच राहूयाबैठकीत काही संस्थाचालकांनी स्पष्ट भूमिका मांडली. साहेब, सतेज पाटील यांच्या मोर्चालाही आपण गेलो नव्हतो. मग या मोर्चासाठी कशाला आग्रह धरता, अशी विनंती संस्थाचालक करीत होते.