शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

त्रुटी दाखवा; राजकीय भांडवल कशासाठी? : अरुण नरके ,पन्हाळा-गगनबावड्यात उत्पादकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:39 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यासाठी त्रुटी दाखविणाºयाचे स्वागत केले पाहिजे; पण त्याचे राजकीय भांडवल केले तर ते संस्थेसाठी घातक असते.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यासाठी त्रुटी दाखविणाºयाचे स्वागत केले पाहिजे; पण त्याचे राजकीय भांडवल केले तर ते संस्थेसाठी घातक असते. ‘गोकुळ’बाबत सध्या हेच सुरू असून, सतेज पाटील यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे; पण त्यांचा त्यामागील उद्देश चुकीचा असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शनिवारी केले.

‘गोकुळ’च्या वतीने गुरुवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार असून, त्याच्या नियोजनासाठी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील दूध उत्पादक शेतकºयांची बैठक कोल्हापुरात झाली. त्यामध्ये त्यांनी परखड भूमिका मांडली. नरके म्हणाले, जगभरात गाईच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर दबाव आणणे संयुक्तिक असताना त्याचे राजकीय भांडवल केले जाते, हे उत्पादकांच्या दृष्टीने घातक आहे.

नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आपणाला रस नसून यातून ‘गोकुळ’ला दगाफटका बसू नये. संघाच्या कारभाराबाबत काही त्रुटी असतीलही, त्या दाखवाव्यात आणि संचालकांनी त्यामध्ये सुधारणाही केल्या पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. सतेज पाटील यांना त्रुटी दाखविण्याचा आणि दरवाढ मागण्याचा हक्क आहे. त्यांनी माहिती मागितली आणि ती दिली नसेल तर त्यांनी पुढचे पाऊल उचलावे. सर्वच बाबतींत सर्वसाधारण सभेचे भांडवल करून आगपाखड करणे योग्य नाही.

दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, पावडर खरेदी करावी, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नरके यांनी केले. याप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास जाधव, डी. जी. पाटील, शामराव पाटील, अंबाजी पाटील, आबा रामा पाटील, एम. जे. पाटील, तानाजी पाटील, आदी उपस्थित होते.सगळे ‘गोकुळ’च बाद कसे?एवढा मोठा डोलारा हाताळताना काही चुका होत जातात. प्रशासन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यावरून सगळे ‘गोकुळ’च बाद असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे नरके यांनी सांगितले.साहेब, तटस्थच राहूयाबैठकीत काही संस्थाचालकांनी स्पष्ट भूमिका मांडली. साहेब, सतेज पाटील यांच्या मोर्चालाही आपण गेलो नव्हतो. मग या मोर्चासाठी कशाला आग्रह धरता, अशी विनंती संस्थाचालक करीत होते.