शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

रेमडेसिविरची टंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई शनिवारीदेखील कायम राहिली. शुक्रवारी आलेली ७०० इंजेक्शन हातोहात संपल्याने इतरांना हात हलवीत परत ...

कोल्हापूर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई शनिवारीदेखील कायम राहिली. शुक्रवारी आलेली ७०० इंजेक्शन हातोहात संपल्याने इतरांना हात हलवीत परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातही इंजेक्शनसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.

जिल्ह्यातून रेमडेसिविरची जवळपास ६५ हजार इंजेक्शनची मागणी शासनाकडे नाेंदविण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय महाविद्यालयातून १५ हजार, खासगीतून १५ हजार, तर सरकारी दवाखान्यांतून ३५ हजार अशी इंजेक्शन्सची मागणी आहे. शुक्रवारी यातील केवळ ७०० इंजेक्शन उपलब्ध झाली; पण शनिवारी तीही संपल्याने इंजेक्शनसाठी धावाधाव करण्याची वेळ नातेवाइकांवर आली.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णामध्ये ऑक्सिजनही पातळी कमी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन सुरू केले जातात. एका रुग्णाला सहा याप्रमाणे हा डोस दिला जातो; पण सुरुवातीला इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर नेमकी गरज आहे, त्यांच्याऐवजी नको त्यांना ते इंजेक्शन घेऊ दिले गेले. शिवाय गरज नसतानाही सुरुवातीच्या काळात इंजेक्शन रुग्णांना दिले गेले. गावोगावच्या लहान डॉक्टरांनीदेखील हे इंजेक्शन घेऊन ठेवले. यातून साठेबाजी वाढत जाऊन त्याचा आता काळाबाजार सुरू झाला आहे.

हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला गेला, तरीदेखील काहीही परिणाम झालेला नाही. इंजेक्शनची पळवापळवी सुरू असल्याने अत्यंत गरजू असलेल्या रुग्णांना ते मिळणे दुरापास्त झाले आहे. नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहे. पुणे, सांगलीतही उपलब्ध होत नसल्याने जादा पैसे मोजून बेळगावमधूनदेखील मागविले जात आहे.

चौकट ०१

वापराबाबत प्रबोधन गरजेचे

यासंदर्भात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रेमडेसिविरचा गैरवापर सुरू झाल्यानेच टंचाई जाणवत असल्याचे सांगितले. कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णाचे सीटी स्कॅन ॲडमिट झाल्याच्या तीन दिवसांनी करावयाचे असते; पण सध्या पहिल्या दिवशीच केले जात असल्याने कोरोनाची तीव्रता कळत नाही, पुढे चार दिवसांनंतर कोेरोना उग्र स्वरूप धारण करतो. त्यामुळे रेमडेसिविरसह सिटी स्कॅनच्या वापराविषयीही प्रबोधनाची गरज असल्याचे सांगितले.