शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सकाळी उघडलेली दुकाने दुपारनंतर पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

कोल्हापूर : तब्बल ८१ दिवसांनंतर कोल्हापूर शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने सोमवारी सकाळी सुरू केली. मात्र, व्यापारी ...

कोल्हापूर : तब्बल ८१ दिवसांनंतर कोल्हापूर शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने सोमवारी सकाळी सुरू केली. मात्र, व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार पुन्हा दुपारी साडेतीननंतर दुकाने बंद केली. दुकाने सुरू करण्यावरून महाद्वार रोड येथे व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि महापालिकेच्या भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात वादावादी झाल्याने याठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनने केलेल्या आवाहनानुसार दुकाने सुरू करण्यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मी रोड, शाहपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरातील बहुतांश व्यापारी, व्यावसायिक आपापल्या दुकानांमध्ये आले. जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने उघडल्यास संबंधित व्यापारी, व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महाद्वार रोड येथे महापालिकेचे १६ जणांचे पथक दाखल झाले होते. दंडात्मक कारवाई होईल या भीतीने महाद्वार रोड, गुजरीतील अनेक व्यापारी आपापल्या दुकानाच्या दारात थांबून होते. काहींनी दुकानाचे अर्धे दार, शटर उघडले होते. महापालिकेचे पथक आल्याचे समजताच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक राहुल नष्टे, संपत पाटील, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार, संचालक शिवाजी पाटील आदी याठिकाणी आले. ‘दुकाने सुरू करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, ‘कारवाई होऊ देत नाही’, असे सांगत दुकाने सुरू करण्याचे आवाहन करत महाद्वार रोड, गुजरी परिसरातून फेरी मारली. जोतिबा रोडच्या चौकात महापालिकेच्या भरारी पथकातील अधिकारी सचिन जाधव, पंडित पोवार आदींसह कर्मचारी थांबले होते. तेथे व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आले. त्यांच्यात दुकाने सुरू करण्यावरून शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला. अधिकारी आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आपल्या भूमिका, मुद्यावर ठाम राहिले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेतच्या बैठकीतील चर्चेनंतर पुढील भूमिका घेण्याचे या दोन्ही घटकांनी ठरविल्याने येथील वातावरण निवळले. त्यानंतर शासनाने सर्व दुकाने सुरू करण्यास रीतसर परवानगी द्यावी. त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन व्यापारी संघटनांनी दुपारी दीडच्या सुमारास केले. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी, तर बहुतांश जणांनी दुपारी चारनंतर दुकाने बंद केली.

चौकट

दोऱ्या आणून द्या, आम्ही आत्महत्या करतो

गेल्या अडीच महिन्यांपासून दुकाने बंद असली, तरी आमचा घरफाळा, पाणीपट्टी, वीज बिल कमी केलेले नाही. दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, नाही तर आम्हाला दोऱ्या आणून द्या, आम्ही आत्महत्या करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.

चौकट

सकाळी बाजारपेठांमध्ये गर्दी

दुकाने सुरू करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून व्यापारी आल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेतची बैठक सुरू होईपर्यंत बहुतांश दुकाने सुरू झाली. त्यामध्ये सराफ, कपडे, स्टेशनरी, मोबाईल आदी दुकानांचा समावेश होता. दुकाने उघडल्यानंतर आतील साफसफाई, उत्पादने योग्य पद्धतीने लावणे, आदी स्वरूपातील कामे व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली. दुपारी चारनंतर पुन्हा दुकाने बंद केली. त्यानंतर या बाजारपेठांमध्ये पुन्हा शुकशुकाट पसरला.