शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

By admin | Updated: May 16, 2017 18:43 IST

जिल्हा पुरवठा विभागाची सभा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : पीओएस मशिनद्वारे रेशनिंग व्यवहार हा शासनाचा निर्धार आहे. त्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे दुकानदारांनाही अर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यांना बँकिंग प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. भविष्यातही दुकानदारांसाठी चांगले निर्णय घेण्यात येतील. त्यांच्या आडचणीही दूर केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्याने १५ मे अखेर संपुर्ण राज्यात २ लाख ५५ हजारांहून अधिक शिधापत्रिकेवर पीओएसद्वारे व्यवहार केले आहेत. त्यावर ६० लाख किलो धान्य वाटप केले आहे. यात राज्यात कोल्हापूर जिल्हा अघाडीवर आहे. पुढील कालावधीत देखील कामगिरीत सातत्य रहावे यासाठी रास्तभाव धान्य दुकानदारांसह क्षेत्रीय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व संबधित घटकांची संयुक्त सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानांसाठीचे धान्य अन्यत्र वळविल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. अशा बाबींना आळा घालणे, पारदर्शी व्यवहारासाठी बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, बायोमेट्रीक रेशनिंगमध्ये राज्यात प्रथम येण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मनाला पटलेल्या गोष्टी अंमलात आणण्यामध्ये कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. यापुढेही सर्वानी सहकार्य करावे.

या सभेमध्ये बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये कोल्हापूरला अव्वलस्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलेले रास्तभाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी रेवडेकर, आदी उपस्थित होते.

नवनवीन संकल्पनांमध्ये कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग

बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतील आहे. हे यश कोल्हापूरवासीयांच्या उस्फुर्त सहभागामुळे साध्य झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबविण्यामध्ये उस्फुर्त सहभागी असतो, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.