शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

By admin | Updated: May 16, 2017 18:43 IST

जिल्हा पुरवठा विभागाची सभा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : पीओएस मशिनद्वारे रेशनिंग व्यवहार हा शासनाचा निर्धार आहे. त्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे दुकानदारांनाही अर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यांना बँकिंग प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. भविष्यातही दुकानदारांसाठी चांगले निर्णय घेण्यात येतील. त्यांच्या आडचणीही दूर केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्याने १५ मे अखेर संपुर्ण राज्यात २ लाख ५५ हजारांहून अधिक शिधापत्रिकेवर पीओएसद्वारे व्यवहार केले आहेत. त्यावर ६० लाख किलो धान्य वाटप केले आहे. यात राज्यात कोल्हापूर जिल्हा अघाडीवर आहे. पुढील कालावधीत देखील कामगिरीत सातत्य रहावे यासाठी रास्तभाव धान्य दुकानदारांसह क्षेत्रीय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व संबधित घटकांची संयुक्त सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानांसाठीचे धान्य अन्यत्र वळविल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. अशा बाबींना आळा घालणे, पारदर्शी व्यवहारासाठी बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, बायोमेट्रीक रेशनिंगमध्ये राज्यात प्रथम येण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मनाला पटलेल्या गोष्टी अंमलात आणण्यामध्ये कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. यापुढेही सर्वानी सहकार्य करावे.

या सभेमध्ये बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये कोल्हापूरला अव्वलस्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलेले रास्तभाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी रेवडेकर, आदी उपस्थित होते.

नवनवीन संकल्पनांमध्ये कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग

बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतील आहे. हे यश कोल्हापूरवासीयांच्या उस्फुर्त सहभागामुळे साध्य झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबविण्यामध्ये उस्फुर्त सहभागी असतो, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.