शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

By admin | Updated: May 16, 2017 18:43 IST

जिल्हा पुरवठा विभागाची सभा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : पीओएस मशिनद्वारे रेशनिंग व्यवहार हा शासनाचा निर्धार आहे. त्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे दुकानदारांनाही अर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यांना बँकिंग प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. भविष्यातही दुकानदारांसाठी चांगले निर्णय घेण्यात येतील. त्यांच्या आडचणीही दूर केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्याने १५ मे अखेर संपुर्ण राज्यात २ लाख ५५ हजारांहून अधिक शिधापत्रिकेवर पीओएसद्वारे व्यवहार केले आहेत. त्यावर ६० लाख किलो धान्य वाटप केले आहे. यात राज्यात कोल्हापूर जिल्हा अघाडीवर आहे. पुढील कालावधीत देखील कामगिरीत सातत्य रहावे यासाठी रास्तभाव धान्य दुकानदारांसह क्षेत्रीय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व संबधित घटकांची संयुक्त सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानांसाठीचे धान्य अन्यत्र वळविल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. अशा बाबींना आळा घालणे, पारदर्शी व्यवहारासाठी बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, बायोमेट्रीक रेशनिंगमध्ये राज्यात प्रथम येण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मनाला पटलेल्या गोष्टी अंमलात आणण्यामध्ये कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. यापुढेही सर्वानी सहकार्य करावे.

या सभेमध्ये बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये कोल्हापूरला अव्वलस्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलेले रास्तभाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी रेवडेकर, आदी उपस्थित होते.

नवनवीन संकल्पनांमध्ये कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग

बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतील आहे. हे यश कोल्हापूरवासीयांच्या उस्फुर्त सहभागामुळे साध्य झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबविण्यामध्ये उस्फुर्त सहभागी असतो, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.