शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

नगरसेवकांची ठेकेदारीतून दुकानदारी

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

कारभाऱ्यांचा हस्तक्षेप अधोरेखित : इचलकरंजी पालिकेतील अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर

इचलकरंजी : येथील आजी-माजी नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान शिवीगाळ, अंगावर धावून जाणे अशी सोमवारी झालेली घटना ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी व ठेकेदारीतून घडल्याने पालिकेच्या कारभाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. याशिवाय नगरपालिकेच्या बाहेरील काही कारभाऱ्यांचा कामकाजात होणारा हस्तक्षेपही अधोरेखित झाला आहे.२०११ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविताना त्यावेळी राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे यापूर्वी कधीही झाल्या नाहीत, अशा ईर्ष्येने या निवडणुका लढविल्या गेल्या. निवडणुकीच्या प्रचारात मान्यवर पक्षांचे स्थानिक, जिल्हा व राज्यस्तरीय नेतेही कोपरा सभा व पदयात्रा घेत होते. ईर्ष्येबरोबरीनेच निवडणुकीसाठी लाखोंची उधळण करण्याची स्पर्धाही उमेदवारांत होती.निवडणुकीतील मतमोजणीच्या निकालात कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १० व ‘शविआ’चे १७ नगरसेवक निवडून आले. सत्तेत येताना दोन्ही कॉँग्रेसची आघाडी झाली. निवडणुकीत झालेली उधळण पुन्हा जमविण्यासाठी काही नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावात विविध विकासकामांचे व नागरी सेवा-सुविधांचे ठेके घेतले आणि यातूनच ठेकेदारीची स्पर्धा झाली आणि कामांचाही दर्जा घसरला, अशी पालिकेत चर्चा आहे.सोमवारी नगरसेवक मोहन कुंभार त्यांच्या प्रभागातील स्वच्छता गेले काही दिवस होत नसल्याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यानंतर कुंभार यांनी डॉ. संगेवार यांना अपशब्द वापरल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या दालनात निदर्शने केली. तेथे आलेले नगरसेवक कुंभार व डॉ. संगेवार यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. याचवेळी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी या प्रकरणात घुसखोरी केली. कुंभार व चाळके यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि चाळके यांनी कुंभार यांना बूट दाखविला. त्यामुळे नगरपालिकेमध्ये जोरदार गदारोळ उडाला.या घटनेनंतर कुंभार यांचे बिंग फोडताना, त्या प्रभागातील साफसफाईचा ठेका त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याला मिळवून दिला होता. तो नंतर रवी लोहार यांच्या कार्यकर्त्याला विकला. तेव्हा कुंभार यांना दोन लाख रुपये देण्यात आले होते आणि पुन्हा कुंभार पाच लाख रुपये मागत असल्याचा आरोप रवी लोहार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आणि मोबाईलवर संग्रहित केलेले संबंधित संभाषण ऐकविले, तर नगरपालिकेशी चाळके यांचा काय संबंध, असा प्रश्न कुंभार यांनी या वादावेळी उपस्थित केला होता. अशा प्रकारच्या घटना काल घडून गेल्याने पालिकेचा कारभार हाकणाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाचे अंजन डोळ्यात घालून संबंधितांनी आपल्या कारभारात योग्य ती दुरुस्ती करावी, अशी चर्चा पालिकेतील कर्मचारी व नागरिकांमध्ये आज दिवसभर होती. (प्रतिनिधी)