शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

गुड न्यूज : पन्हाळगडावर बसणार शिवस्नुषा ताराराणींच्या शौर्यगाथेचा लेख

By संदीप आडनाईक | Updated: January 1, 2024 13:19 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा ...

संदीप आडनाईककोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती ताराराणी यांची शौर्यगाथा मांडणारा कोरीव लेख पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका नव्या वर्षात बसवणार आहे.ज्येष्ठ इतिहासकार व ताराराणींचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन माळी, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रयत्नातून ही प्रदीर्घकाळ टिकणारा कोरीव लेख पन्हाळगडावरील ताराराणींच्या राजवाड्यासमोर लवकरच विराजमान होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष निधीची उपलब्धता करण्याचे नियोजन आहे.छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी (जन्म : १४ एप्रिल १६७५, मृत्यू : ९ डिसेंबर १७६१) अवघ्या २५ वर्षांच्या असताना औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, मुघल सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला. पन्हाळगडावर त्यांनी १७०५ मध्ये राजधानी बनविली आणि राज्य कारभार केला. त्याची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आणि ठिकाणे पन्हाळ्यावर आजही पाहायला मिळतात. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका आणि पन्हाळा विद्यामंदिर ज्या जागेत आहे, ती वास्तू ताराराणींचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या राजवाड्यासमोरच पन्हाळावासीयांकडून त्यांच्या सन्मानार्थ हा कोरीव लेख बसविण्यात येत आहे.डॉ. पवार यांनी या कोरीव लेखासाठी १५ ते २० ओळींचे प्रेरणादायी लिखाण केले आहे. यावर नेमक्या शब्दांत ताराराणींची कर्तबगारी मांडण्यात येणार आहे. त्यात ताराराणींबद्दल स्वराज्याचा शत्रू असलेल्या व्यक्तींच्या उद्गारापासून कवी देवदत्त, कवी गोविंद आदींच्या कवितांचा समावेश आहे. मराठ्यांचा कट्टर शत्रू, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान, भीमसेन सक्सेना याने काढलेले गौरवाद्गार, अलीकडच्या काळातील मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठात प्राध्यापक डॉ. रिचर्ड मॅक्सवेल इटन यांचे मत यांचा समावेश या कोनशिलेवर असणार आहे.

महाराणी ताराराणी यांनी कमी वयात अभूतपूर्व संघर्ष करत स्वराज्याचे रक्षण केले. करवीरसारख्या छोट्याशा राज्याची एक राणी सलग ७ वर्षे जगातील बलाढ्य सम्राट औरंगजेबाशी लढा देते असे उदाहरण जगाच्या इतिहासात अन्यत्र नाही, तिची बरोबरी करणारे जगाच्या इतिहासात कोणीही झालेले नाही, यावर जगप्रसिद्ध इतिहासकार डॉ. इटन यांनी शिक्कामोर्तब केले आहे. -डाॅ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर