शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तडकाफडकी पदमुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 17, 2023 18:30 IST

नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला होता

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितींतर्गत देवस्थानांच्या कारभारात सुधारणा करून विकासाच्या दृष्टीने काम करणारे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा समिती सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी तडकाफडकी काढून घेतला. राधानगरी कागलचे प्रांताधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्याकडे हा कार्यभार दिला.

माध्यमांच्या कॅमेऱ्यांना गुरुवारपासून अंबाबाई मंदिरात बंदी घालण्यात आली. त्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर नाईकवाडे यांनी हा प्रशासकांचा (म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा) निर्णय आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता, असे स्पष्टीकरण दिल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांना ते आवडले नाही. म्हणून त्यांना पदमुक्त केल्याची चर्चा आहे. त्यांची पदमुक्ती रद्द व्हावी यासाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत.

देवीची निस्सीम सेवा करताना दिवस रात्रीचीही तमा बाळगता स्वत:ला झोकून देऊन काम केलेल्या अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता शुक्रवारी सकाळी पदमुक्त केले गेले यावरून तर्कवितर्काना उधाण आले आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समितीमधील खाबुगिरी, निविदांमधून टक्केवारीची पद्धत बंद केली. दानशूर भक्तांना सोबत घेऊन अंबाबाई, जोतिबा देवस्थानांसह समितीच्या कामकाजात सुधारणा केल्या. विकासाची पावले उचलली.

मंदिरातील संगरमरवरी फरशी काढून मूळ स्वरूप उजेडात आणणे, समितीचे उत्पन्न वाढ, मणिकर्णिका कुंडाच्या रखडलेल्या कामात माउली लॉजच्या संपादनाची प्रक्रिया, अंबाबाईचा तुटलेला रथ नव्याने करून घेतला, मंदिराचे दरवाजे बदलले, धोकादायक गरुड मंडपाची दुरुस्ती करून घेतली. त्या पुढे दांडेलीला जाऊन सागवान लाकडाचा शोध घेतला. अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी येथील नागरिकांना भूसंपादनासाठी विनंती पत्रे पाठवली. जोतिबा विकास आराखड्याचे काम सुरू केले.

आधी पाठराखण... मग आता असे का?समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी केली म्हणून फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मादाय कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नाईकवाडे यांना पदमुक्त करण्यासाठीचे पत्र पाठवले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मी सोडणार नाही, असे सांगत पदमुक्त केले नाही. मग आता असे काय घडले की तडकाफडकी पदमुक्त केले हेच कळेनासे झाले आहे.

आंदोलनाचा पवित्रा...नाईकवाडे यांना पदमुक्त करू नये यासाठी अनेकांनी आमदार, खासदारांशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटायला आले. त्यांनी हा निर्णय बदलला नाही तर आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा दिला आहे. नाईकवाडे त्या पदावर राहिले पाहिजेत अशीच लोकभावनाही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर