शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तडकाफडकी पदमुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 17, 2023 18:30 IST

नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला होता

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितींतर्गत देवस्थानांच्या कारभारात सुधारणा करून विकासाच्या दृष्टीने काम करणारे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा समिती सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी तडकाफडकी काढून घेतला. राधानगरी कागलचे प्रांताधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्याकडे हा कार्यभार दिला.

माध्यमांच्या कॅमेऱ्यांना गुरुवारपासून अंबाबाई मंदिरात बंदी घालण्यात आली. त्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर नाईकवाडे यांनी हा प्रशासकांचा (म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा) निर्णय आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता, असे स्पष्टीकरण दिल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांना ते आवडले नाही. म्हणून त्यांना पदमुक्त केल्याची चर्चा आहे. त्यांची पदमुक्ती रद्द व्हावी यासाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत.

देवीची निस्सीम सेवा करताना दिवस रात्रीचीही तमा बाळगता स्वत:ला झोकून देऊन काम केलेल्या अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता शुक्रवारी सकाळी पदमुक्त केले गेले यावरून तर्कवितर्काना उधाण आले आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समितीमधील खाबुगिरी, निविदांमधून टक्केवारीची पद्धत बंद केली. दानशूर भक्तांना सोबत घेऊन अंबाबाई, जोतिबा देवस्थानांसह समितीच्या कामकाजात सुधारणा केल्या. विकासाची पावले उचलली.

मंदिरातील संगरमरवरी फरशी काढून मूळ स्वरूप उजेडात आणणे, समितीचे उत्पन्न वाढ, मणिकर्णिका कुंडाच्या रखडलेल्या कामात माउली लॉजच्या संपादनाची प्रक्रिया, अंबाबाईचा तुटलेला रथ नव्याने करून घेतला, मंदिराचे दरवाजे बदलले, धोकादायक गरुड मंडपाची दुरुस्ती करून घेतली. त्या पुढे दांडेलीला जाऊन सागवान लाकडाचा शोध घेतला. अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी येथील नागरिकांना भूसंपादनासाठी विनंती पत्रे पाठवली. जोतिबा विकास आराखड्याचे काम सुरू केले.

आधी पाठराखण... मग आता असे का?समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी केली म्हणून फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मादाय कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नाईकवाडे यांना पदमुक्त करण्यासाठीचे पत्र पाठवले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मी सोडणार नाही, असे सांगत पदमुक्त केले नाही. मग आता असे काय घडले की तडकाफडकी पदमुक्त केले हेच कळेनासे झाले आहे.

आंदोलनाचा पवित्रा...नाईकवाडे यांना पदमुक्त करू नये यासाठी अनेकांनी आमदार, खासदारांशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटायला आले. त्यांनी हा निर्णय बदलला नाही तर आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा दिला आहे. नाईकवाडे त्या पदावर राहिले पाहिजेत अशीच लोकभावनाही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर