शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तडकाफडकी पदमुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 17, 2023 18:30 IST

नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला होता

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितींतर्गत देवस्थानांच्या कारभारात सुधारणा करून विकासाच्या दृष्टीने काम करणारे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा समिती सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी तडकाफडकी काढून घेतला. राधानगरी कागलचे प्रांताधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्याकडे हा कार्यभार दिला.

माध्यमांच्या कॅमेऱ्यांना गुरुवारपासून अंबाबाई मंदिरात बंदी घालण्यात आली. त्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर नाईकवाडे यांनी हा प्रशासकांचा (म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा) निर्णय आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता, असे स्पष्टीकरण दिल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांना ते आवडले नाही. म्हणून त्यांना पदमुक्त केल्याची चर्चा आहे. त्यांची पदमुक्ती रद्द व्हावी यासाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत.

देवीची निस्सीम सेवा करताना दिवस रात्रीचीही तमा बाळगता स्वत:ला झोकून देऊन काम केलेल्या अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता शुक्रवारी सकाळी पदमुक्त केले गेले यावरून तर्कवितर्काना उधाण आले आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या नाईकवाडे यांच्याकडे दीड वर्षापूर्वी देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समितीमधील खाबुगिरी, निविदांमधून टक्केवारीची पद्धत बंद केली. दानशूर भक्तांना सोबत घेऊन अंबाबाई, जोतिबा देवस्थानांसह समितीच्या कामकाजात सुधारणा केल्या. विकासाची पावले उचलली.

मंदिरातील संगरमरवरी फरशी काढून मूळ स्वरूप उजेडात आणणे, समितीचे उत्पन्न वाढ, मणिकर्णिका कुंडाच्या रखडलेल्या कामात माउली लॉजच्या संपादनाची प्रक्रिया, अंबाबाईचा तुटलेला रथ नव्याने करून घेतला, मंदिराचे दरवाजे बदलले, धोकादायक गरुड मंडपाची दुरुस्ती करून घेतली. त्या पुढे दांडेलीला जाऊन सागवान लाकडाचा शोध घेतला. अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी येथील नागरिकांना भूसंपादनासाठी विनंती पत्रे पाठवली. जोतिबा विकास आराखड्याचे काम सुरू केले.

आधी पाठराखण... मग आता असे का?समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी केली म्हणून फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मादाय कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नाईकवाडे यांना पदमुक्त करण्यासाठीचे पत्र पाठवले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मी सोडणार नाही, असे सांगत पदमुक्त केले नाही. मग आता असे काय घडले की तडकाफडकी पदमुक्त केले हेच कळेनासे झाले आहे.

आंदोलनाचा पवित्रा...नाईकवाडे यांना पदमुक्त करू नये यासाठी अनेकांनी आमदार, खासदारांशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटायला आले. त्यांनी हा निर्णय बदलला नाही तर आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा दिला आहे. नाईकवाडे त्या पदावर राहिले पाहिजेत अशीच लोकभावनाही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर