शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

शिवाजी विद्यापीठातील ‘सेमीस्टर’चा मुद्दा सापडणार पेचात, अधिकार मंडळांच्या निर्णयावर ठरणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:55 IST

एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्याचे दिसते.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील ‘सेमीस्टर’चा मुद्दा सापडणार पेचातअधिकार मंडळांच्या निर्णयावर ठरणार कार्यवाही

कोल्हापूर : एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्याचे दिसते.सेमीस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोनवेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतित होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमीस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमीस्टर बंद करावी, याबाबतचा ठराव दि. २७ मार्चला अधिसभेने एकमताने मंजूर झाला.

या ठरावाद्वारे अधिसभेने सेमीस्टर बंद करावी, अशी शिफारस परीक्षा व मूल्यमापन मंडळाला केली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुंबईत कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेने केलेला ठराव आता अधिष्ठाता मंडळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळानंतर विद्या परिषदेसमोर सादर होईल. या मंडळांच्या निर्णयानुसार सेमीस्टर बंद करायची की, सुरू ठेवायची याबाबतची कार्यवाही होणार आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार या मंडळांना कामकाज करणे, निर्णय घेण्याबाबत अधिकार आहेत. त्यामुळे सेमीस्टर बंदबाबत या मंडळांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी करायची की, सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाही करायची, असा पेच विद्यापीठासमोर निर्माण होणार आहे.

मुंबईमध्ये सर्व कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार सेमीस्टर पद्धतीबाबत विद्यापीठाला कार्यवाही करणे आवश्यक आहे. सेमीस्टर बंद करण्याबाबत अधिसभेने पुढील अधिकार मंडळांना शिफारस केली आहे. याअनुषंगाने पुढील निर्णय संबंधित अधिकार मंडळांमध्ये घेतला जाईल.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर