शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिवाजी विद्यापीठातील ‘सेमीस्टर’चा मुद्दा सापडणार पेचात, अधिकार मंडळांच्या निर्णयावर ठरणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:55 IST

एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्याचे दिसते.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील ‘सेमीस्टर’चा मुद्दा सापडणार पेचातअधिकार मंडळांच्या निर्णयावर ठरणार कार्यवाही

कोल्हापूर : एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्याचे दिसते.सेमीस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोनवेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतित होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमीस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमीस्टर बंद करावी, याबाबतचा ठराव दि. २७ मार्चला अधिसभेने एकमताने मंजूर झाला.

या ठरावाद्वारे अधिसभेने सेमीस्टर बंद करावी, अशी शिफारस परीक्षा व मूल्यमापन मंडळाला केली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुंबईत कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेने केलेला ठराव आता अधिष्ठाता मंडळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळानंतर विद्या परिषदेसमोर सादर होईल. या मंडळांच्या निर्णयानुसार सेमीस्टर बंद करायची की, सुरू ठेवायची याबाबतची कार्यवाही होणार आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार या मंडळांना कामकाज करणे, निर्णय घेण्याबाबत अधिकार आहेत. त्यामुळे सेमीस्टर बंदबाबत या मंडळांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी करायची की, सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाही करायची, असा पेच विद्यापीठासमोर निर्माण होणार आहे.

मुंबईमध्ये सर्व कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार सेमीस्टर पद्धतीबाबत विद्यापीठाला कार्यवाही करणे आवश्यक आहे. सेमीस्टर बंद करण्याबाबत अधिसभेने पुढील अधिकार मंडळांना शिफारस केली आहे. याअनुषंगाने पुढील निर्णय संबंधित अधिकार मंडळांमध्ये घेतला जाईल.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर