शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:51 IST

बहुमान : सांडपाणी प्रक्रियेसाठी वनस्पतीचा वापर

कोल्हापूर : रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. हे शिवाजी विद्यापीठाचे संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनास हा बहुमान मिळाला आहे. जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती प्रकाशित केली आहे. त्याला या विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. पी. गोविंदवार यांना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धिकरणविषयक संशोधनासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रकल्प मंजूर झाला होता. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच ‘पायलट स्केल रिक्टर’ बनविण्यात आले. या प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या (६६६.ुि३्रल्ल्िरं.ल्ल्रू.्रल्ल) या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी डॉ. ज्योती जाधव, विश्वास बापट, अनुराधा कागलकर, राहुल खंडारे, अखिल काब्रा, अनुप्रिता वाठारकर, अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम, स्वप्निल पाटील यांचे योगदान लाभले. (प्रतिनिधी)नवा मानदंड प्रस्थापित : कुलगुरूया संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. यू. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनाला मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून तसे टिष्ट्वटही केले आहे.- प्रा. एस. पी. गोविंदवार, जीवनरसायनशास्त्र विभाग