शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:51 IST

बहुमान : सांडपाणी प्रक्रियेसाठी वनस्पतीचा वापर

कोल्हापूर : रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. हे शिवाजी विद्यापीठाचे संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनास हा बहुमान मिळाला आहे. जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती प्रकाशित केली आहे. त्याला या विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. पी. गोविंदवार यांना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धिकरणविषयक संशोधनासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रकल्प मंजूर झाला होता. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच ‘पायलट स्केल रिक्टर’ बनविण्यात आले. या प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या (६६६.ुि३्रल्ल्िरं.ल्ल्रू.्रल्ल) या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी डॉ. ज्योती जाधव, विश्वास बापट, अनुराधा कागलकर, राहुल खंडारे, अखिल काब्रा, अनुप्रिता वाठारकर, अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम, स्वप्निल पाटील यांचे योगदान लाभले. (प्रतिनिधी)नवा मानदंड प्रस्थापित : कुलगुरूया संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. यू. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनाला मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून तसे टिष्ट्वटही केले आहे.- प्रा. एस. पी. गोविंदवार, जीवनरसायनशास्त्र विभाग