शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिवाजी पूल दुचाकी; तीनचाकी वाहनांसाठी खुला, पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:00 IST

शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे

ठळक मुद्देशिवाजी पूल दुचाकी; तीनचाकी वाहनांसाठी खुलापावसाचा जोर कमी; पूरस्थिती कायम ५७ बंधारे पाण्याखाली : दूधगंगेतून जलविसर्ग वाढविला

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर शनिवारी कमी राहिला. असे असले तरी तुडुंब भरलेल्या नद्यांमुळे पुराची स्थिती कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी ती ४१.५ फुटांवर राहिली.

यामुळे शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे. दूधगंगा धरणातून सकाळी एक हजार क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आल्याने या नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर दोन दिवसांपासून कमी राहिला आहे. जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली असून, राष्ट्रीय महामार्ग १, राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा १२, ग्रामीण १५ व इतर जिल्हा २० असे ५१ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असल्याने शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. चारचाकी व अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघडझाप होऊन काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. शहरातील सुतारवाड्यासह सखल भागांतील पाणी अद्याप उतरलेले नाही.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे शुक्रवारी (दि. २०) खुले झाल्याने येथून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दूधगंगा धरणातूनही सकाळी एक हजार क्युसेकने विसर्ग वाढविला; यामुळे एकूण पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून, दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी राजाराम बंधारा येथे ती ४१.५ फुटांवर राहिली.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत शनिवारी सकाळी आठपर्यंत १९.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (५.५०), शिरोळ (२.५७), पन्हाळा (२०.१४), शाहूवाडी (३१.००), राधानगरी (२५.८३), गगनबावडा (४५.५०), करवीर (१२.००), कागल (१२.५७), गडहिंग्लज (८.५७), भुदरगड (२२.४०), आजरा (३१.७५), चंदगड (१६.६६). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर