शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती, मिरवणुका शांततेने पार पाडा

By admin | Updated: May 6, 2016 01:12 IST

इचलकरंजी परिसर : अखेरची मिरवणूक होईपर्यंत फलक हटविले जाणार नाहीत - सुरेश हाळवणकर

इचलकरंजी : शहरात शिवजयंती साजरी करण्याविषयी उत्साह असला तरी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शिवजयंतीबरोबरच मिरवणुकाही पार पाडावयाच्या आहेत. अखेरची मिरवणूक पार पडेपर्यंत शहरात उभारण्यात आलेले डिजिटल फलक हटविले जाणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. मात्र, अफवांवर विश्वास न ठेवता शिवप्रेमींनी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.शहर, परिसरामध्ये शिवप्रेमींकडून यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा उत्साह अभूतपूर्व आहे. शिवाजी महाराजांच्या विविध प्रकारच्या छायाचित्रांनी आणि ऐतिहासिक प्रसंग सांगणारे अनेक डिजिटल फलक शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. विशेषत: मुख्य रस्ता व प्रमुख चौकांमधून फलकांची गर्दी आहे. अशा पार्श्वभूमीवर शिवजयंती आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका शांततेने पार पडाव्यात. जनतेने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, यासाठी राजीव गांधी सांस्कृतिक भवनामध्ये पोलिसांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील प्रमुख भाषणात आमदार बोलत होते. ते म्हणाले, शिवजयंतीनिमित्ताने अभूतपूर्व उत्साह वस्त्रनगरीमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, काहीजणांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न होत आहे. याला विशेषत: युवक वर्गाने बळी पडू नये. त्याचबरोबर चुकीचे संदेश देणारे फलक हटवावेत. त्या जागी शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास सांगणारे व प्रबोधनात्मक फलक लावावेत.माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, संपूर्ण शहर शिवमय झाले आहे. विशेषत: युवक वर्गातून शिवजयंती साजरी करण्याचा उत्साह उत्स्फूर्त आहे. शिवजयंती साजरी करताना चांगला संदेश समाजासमोर गेला पाहिजे, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. या उत्सवाला गालबोट लागण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांचे मनसुबे उधळून लावावेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांमार्फत अफवा निर्माण होत असतात. त्यावर विश्वास ठेवू नये. पोलिस यंत्रणेला योग्य ते सहकार्य करावे.पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, शहराची भौगोलिक स्थिती समजावून घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी म्हणून पोलिस संचलन करीत असतात. त्याबाबत कुणीही गैरसमज पसरू नये. मात्र, शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरबाबत लोकांच्या मनात राग निर्माण होत असेल, असे पोस्टर संबंधितांनी स्वत:हून काढून घ्यावेत. या पार्श्वभूमीवर ‘वाल्याचा वाल्मीकी’ होत असल्यास पोलिस त्यांना मदतच करतील, पण अशा व्यक्तींनी सकारात्मक जीवन जगण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत. शिवजयंती साजरी करण्याच्या उत्साहाला पोलिसांकडून विरजण घातले जाणार नाही. कोणतेही पोस्टर पोलिसांकडून उतरविले जाणार नाहीत. मात्र, शिवजयंती उत्साहपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने साजरी करावी की, ज्यामुळे पुढे वर्षभर आपणाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कोळी तथा बाळ महाराज म्हणाले, शिवजयंती शांततेने पार पाडण्याचे कर्तव्य आमचे आहे. त्यासाठी पोलिसांमागे सर्वांनी उभे राहावे. सज्जनपणाने राष्ट्रभक्ती दाखवीत शिवजयंती साजरी करावी. बैठकीमध्ये प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची भाषणे झाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी मनीषा खत्री, डॉ. प्रशांत रसाळ, प्रज्ञा पोतदार, तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, तसेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. विनायक नरळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)इचलकरंजीतील राजीव गांधी भवनात गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, एस. चैतन्य, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मनीषा खत्री, आदी उपस्थित होते.