शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

२००० फुट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ १७५ वर्षानंतर रांगणा किल्ल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 14:08 IST

RangnaFort Tof Kolhapur : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंद व खुशीने डबडबलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जय जिजाऊ, जय शिवाजी! आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्दे बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांचे प्रयत्न आले फळास! गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त !

रमेश वारकेबोरवडे /कागल : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंद व खुशीने डबडबलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जय जिजाऊ, जय शिवाजी! आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत आनंद व्यक्त केला.

अनेक वर्षे जे काम कोणाला जमले नाही ते बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी ग्रुपने करुन दाखवले. याबद्दल त्यांंच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही  तोफ किल्ल्यावरील निंबाळकर वाड्याशेजारी ठेवली आहे. या मोहिमेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे महादेव फराकटे यांच्या हस्ते तोफेचे पूजन करण्यात आले. अखेर पावणे दोनशे वर्षाच्या खडतर वनवासानंतर ही तोफ रांगणा किल्ल्याच्या कुशित विसावली. घनदाट जंगल,वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांचा अभाव, दरीत उतरण्यासाठी फक्त पायवाट, केवळ हाताने चेन ब्लॉक ओढण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा खडतर परिस्थितीतून जीव धोक्यात घालून मार्ग काढत ऐतिहासिक रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ गडावर आणण्यात यश मिळाले.भुदरगड तालुक्यातील रांगणा ऊर्फ प्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली ही तोफ अंदाजे अडीच टन वजनाची आहे. ही तोफ बोरवडे ( ता.कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांनी अथक प्रयत्नाने दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. आता अनेक वर्षांनंतर या तोफा शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.या गडाच्या पायथ्याशी सुमारे २००० फुट खोल दरीत अशी एक तोफ असल्याची माहिती बोरवडे ( ता. कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांना आणि त्रिवेणी ग्रुपचे प्रमुख बोरवडेतील उद्योजक महादेव फराकटे यांना समजली. त्यांनी ही तोफ दरीतून गडावर आणण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गडावर भेट देऊन आवश्यक साहित्याची जमवाजमव केली.यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आणि प्रोत्साहन महादेव फराकटे यांनी दिले.

चालू वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट दरीत उतरुन ही तोफ बाहेर काढण्यास प्रारंभ केला.मोठमोठे दगडगोटे आणि झाडेझुडपे पार करत ते तोफेपर्यंत पोहचले. त्यानंतर गेली दोन महिने या तरुणांनी अथक परिश्रम करित अखेर ही तोफ १५ एप्रिल रोजी गडावर आणण्यात यश मिळविले आहे.तोफ वर काढत असताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि जय शिवाजीच्या घोषात अगदी उत्साहात तोफ वर खेचण्याचे काम एकसारखे सुरु होते.दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर गडावर तोफ आल्यावर शिवरायांचा जयघोष करित या तरुणांनी आनंद व्यक्त केला. या मोहिमेत १३ कायमस्वरुपी युवक आठवड्यातून तीन दिवस सहभागी झाले होते.

यामध्ये सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे ( मडीलगे खुर्द ),प्रविण पाटील ( बिद्री ), शरद फराकटे , नेताजी साठे ,चंद्रकांत वारके ,राहुल मगदूम, मेजर सुनील फराकटे, निखिल परीट,अमर सातपुते, अरुण मगदूम, रघुनाथ वारके ( कासारवाडा ) , प्रज्योत चव्हाण, नेताजी सुर्यवंशी,अवधूत पाटिल ( खानापूर ), तानाजी साठे, भाऊ साठे, बजरंग मांडवकर ( वाळवे खुर्द ), अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील या शिवप्रेमीनी सहभाग घेतला.

आम्ही कठीण परिस्थितीतही यशाला गवसणी घातली असून नैस​र्गिक परिस्थितीचा विचार करता या तोफेचा शोध घेणे एक आव्हान होते. मात्र, घनदाट जंगल आणि शेकडो किलो वजनाची ही तोफ वर आणणे अशक्यप्राय गोष्ट. यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.त्रिवेणी ग्रुपच्या सदस्यांनी महादेव फराकटे यांच्या सहकार्याने रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी दरीत उतरत तोफेचा शोध सुरु केला आणि दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तोफ गडावर आणण्यात या तरुणांना यश आले. दरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांनी पाठीला पाण्याच्या बॉटल बांधून ते दरीत उतरले होते. या यशस्वी मोहिमेनंतर त्रिवेणी गुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.- सुनिल वारके, प्रविण पाटील,सदस्य, रांगणा त्रिवेणी ग्रुप.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर