शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ंिसंचन घोटाळ्याच्या कबरीवर आता शिवसेना माती घालणार

By admin | Updated: June 22, 2014 00:48 IST

दिवाकर रावते : शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

कोल्हापूर : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची कबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढली आहे. त्या कबरीवर शिवसेना येत्या निवडणुकीत माती घातल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील घोटाळेबहाद्दरांनी पोषण आहारातही घोटाळा करत चिमुकल्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.शिवसेनेतर्फे २४ जून ते २३ जुलै या कालावधीत ‘जय महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ हे अभियान हाती घेतले असून या अभियानांतर्गत ‘गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे शिवसैनिक’, ‘प्रत्येकाच्या मनगटात शिवबंधन’, या माध्यमातून शिवसेना घराघरांत पोहोचविली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी कळंबा रोडवरील अमृतसिद्धी हॉल येथे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. रावते बोलत होते. रावते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ची दीक्षा सर्वांना दिली होती. त्यानंतरच हा शब्द प्रचलित झाला. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ हा नारा दिला आहे. या अभियानांतर्गत पक्ष घराघरांत पोहोचवून पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत जावेत हे उद्दिष्ट आहे. अरुण दुधवडकर म्हणाले, लोकसभा पराभवाचे दु:ख खुद्द उद्धव ठाकरे यांना झाले असताना इथे मात्र एकाही तालुकाप्रमुखाने बैठक घेऊन आत्मचिंतन केले काय? अशी विचारणा करत तुम्ही जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व खुद्द पक्षप्रमुखांनाही फसवत आहात, आपापसांत कुरघोड्या करून चालणार नाही.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, लोकसभेतील यशानंतर शिवसेनेला आता सभासद नोंदणीच्या माध्यमातून विचारांची पेरणी करण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. पराभवाने आपण नाउमेद झालेलो नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, आदींची भाषणे झाले. (प्रतिनिधी)