शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिवसेनेने एकदाच काय ते ठरवावे

By admin | Updated: June 24, 2015 00:49 IST

रावसाहेब दानवे : कोल्हापुरातील सेनेच्या निर्धार मेळाव्यातील टीकेचा निषेध

कणकवली : संख्याबळावर कोणता पक्ष मोठा हे ठरते. त्यानुसार युतीमध्ये आमची आता मोठ्या भावाची भूमिका आहे. पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांकडून टीकात्मक वक्तव्ये करण्यापेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाने एकदाच आपली भूमिका जाहीर करावी. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युतीमध्ये भाजपची एकाधिकारशाही चालत असल्याच्या आरोपाचे दानवे यांनी खंडन केले. नेमक्या कोणत्या मुद्द्यावर अधिकार गाजवला तो शिवसेनेकडून सांगितल्यास आरोपाचे उत्तर दिले जाईल. दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांसोबत युतीच्या मंत्र्यांची बैठक होत असते, असे दानवे म्हणाले. पक्षाने दिलेले लक्ष्य पूर्ण करून १ कोटी पाच लाख सदस्य संख्या गाठण्यात आली आहे. या सदस्यांना संपर्काचे महाभियान सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालाने खचून न जाता कार्यकर्त्यांना ताकद देणे व भाजपची पाळेमुळे रूजविणे हा या संपर्क दौऱ्याचा उद्देश आहे. कोकण विकासाचा संकल्प पूर्ण केला जाईल.यावेळी प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, राजन तेली, बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात मंत्रिमंडळ बैठक सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांसाठी पुन्हा दौरा करण्यात येईल. आताच्या दौऱ्यात ज्या सूचना येतील त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेण्याचा आमचा मनोदय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटनाला चालना देण्यात येईल. याशिवाय पक्ष म्हणून प्रदेश कार्यकारिणीची बैठक कोकणात घेण्यात येईल. पदवी परत करण्याचा प्रश्नच नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरील आरोपात तथ्य नाही. त्यांनी पदवीच्या आधारे कोणताही लाभ घेतलेला नाही. ते जे शिकले ते त्यांनी लिहिले. पदवी परत करण्याचा प्रश्न येत नाही. गरिबाची मुले पृथ्वीराज चव्हाणांसारखी विदेशात जाऊ शकत नाहीत. उपजीविकेसाठी मिळेल तिथे अ‍ॅडमिशन घेतात. जेव्हा सरकारसमोर हा प्रश्न येईल. तेव्हा पाहून घेऊ, असे दानवे यांनी सांगितले.