शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिवसेना सत्तेत आहे का ?

By admin | Updated: June 24, 2015 00:45 IST

राज यांचा टोला : जैतापूर वाद एकत्र बसून मिटविण्याची गरज

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पासाठी ८० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आता या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सत्तेत आहे काय? असा थेट प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असल्यासारखे वागा. प्रकल्प व्हावा की नको हे शास्त्रज्ञ बघतील. आता विरोध करून काय फायदा? त्यापेक्षा सत्तेत आहात, तर एकत्र बसून वाद मिटवा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला. गेल्या चार दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मंगळवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका याआधीच आपण स्पष्ट केली आहे. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याठिकाणी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही असे सुरक्षा उपाय योजले जाणारच आहेत. प्रकल्पाला विरोध हा भूसंपादनाआधी होणे समजण्यासारखे आहे. आता भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता विरोध करून काय उपयोग आहे, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणात पर्यटनवृद्धीसाठी दोन-तीन अ‍ॅँकर प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स् होण्याची गरज आहे. मतभेद विसरून उद्धव ठाकरे व आपण भाऊ पुन्हा एकत्र येणार काय, असे विचारल्यास राज यांनी हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे, असे सांगत प्रश्नाला बगल दिली. (प्रतिनिधी)संघटनात्मक बदल अटळ!राज्यात विशेषत: कोकणात मनसेने जोर धरलेला नाही, याची गंभीर दखल घेऊन काही निर्णय घेणार काय, असे विचारले असता संघटना मजबूत करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घ्यावेच लागतात. संघटनेचे बळ वाढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, संघटनात्मक काही बदल हे करावेच लागणार आहेत. त्याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.