शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेत आहे का ?

By admin | Updated: June 24, 2015 00:45 IST

राज यांचा टोला : जैतापूर वाद एकत्र बसून मिटविण्याची गरज

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पासाठी ८० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आता या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सत्तेत आहे काय? असा थेट प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असल्यासारखे वागा. प्रकल्प व्हावा की नको हे शास्त्रज्ञ बघतील. आता विरोध करून काय फायदा? त्यापेक्षा सत्तेत आहात, तर एकत्र बसून वाद मिटवा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला. गेल्या चार दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मंगळवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका याआधीच आपण स्पष्ट केली आहे. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याठिकाणी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही असे सुरक्षा उपाय योजले जाणारच आहेत. प्रकल्पाला विरोध हा भूसंपादनाआधी होणे समजण्यासारखे आहे. आता भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता विरोध करून काय उपयोग आहे, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणात पर्यटनवृद्धीसाठी दोन-तीन अ‍ॅँकर प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स् होण्याची गरज आहे. मतभेद विसरून उद्धव ठाकरे व आपण भाऊ पुन्हा एकत्र येणार काय, असे विचारल्यास राज यांनी हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे, असे सांगत प्रश्नाला बगल दिली. (प्रतिनिधी)संघटनात्मक बदल अटळ!राज्यात विशेषत: कोकणात मनसेने जोर धरलेला नाही, याची गंभीर दखल घेऊन काही निर्णय घेणार काय, असे विचारले असता संघटना मजबूत करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घ्यावेच लागतात. संघटनेचे बळ वाढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, संघटनात्मक काही बदल हे करावेच लागणार आहेत. त्याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.