शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शिवसेना सत्तेत आहे का ?

By admin | Updated: June 24, 2015 00:45 IST

राज यांचा टोला : जैतापूर वाद एकत्र बसून मिटविण्याची गरज

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पासाठी ८० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आता या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सत्तेत आहे काय? असा थेट प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असल्यासारखे वागा. प्रकल्प व्हावा की नको हे शास्त्रज्ञ बघतील. आता विरोध करून काय फायदा? त्यापेक्षा सत्तेत आहात, तर एकत्र बसून वाद मिटवा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला. गेल्या चार दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मंगळवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका याआधीच आपण स्पष्ट केली आहे. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याठिकाणी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही असे सुरक्षा उपाय योजले जाणारच आहेत. प्रकल्पाला विरोध हा भूसंपादनाआधी होणे समजण्यासारखे आहे. आता भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता विरोध करून काय उपयोग आहे, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणात पर्यटनवृद्धीसाठी दोन-तीन अ‍ॅँकर प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स् होण्याची गरज आहे. मतभेद विसरून उद्धव ठाकरे व आपण भाऊ पुन्हा एकत्र येणार काय, असे विचारल्यास राज यांनी हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे, असे सांगत प्रश्नाला बगल दिली. (प्रतिनिधी)संघटनात्मक बदल अटळ!राज्यात विशेषत: कोकणात मनसेने जोर धरलेला नाही, याची गंभीर दखल घेऊन काही निर्णय घेणार काय, असे विचारले असता संघटना मजबूत करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घ्यावेच लागतात. संघटनेचे बळ वाढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, संघटनात्मक काही बदल हे करावेच लागणार आहेत. त्याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.