शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सोयीच्या राजकारणामुळे ‘शिवसेना’ पराभूत महायुतीला निष्क्रियता भोवली : कार्यकर्ते राबले.. नेत्यांत फंदफितुरी

By admin | Updated: May 18, 2014 00:41 IST

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीचे प्रत्यंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नशिबी या निवडणुकीत आले.

 भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीचे प्रत्यंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नशिबी या निवडणुकीत आले. देशपातळीवर निर्माण झालेली नरेंद्र मोदी नावाची लाट, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी आणि शिवसेनेला मिळालेला तुल्यबळ उमेदवार अशी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक परिस्थिती असताना केवळ प्रचारयंत्रणेत जाणीवपूर्वक ठेवलेल्या उणिवा, शिवसैनिक आणि त्यांच्या नेत्यांमधील निष्क्रियता, सोयीचे राजकारण अशा विविध कारणांमुळे शिवसेनेला हातातोंडाला आलेला विजयाचा ‘घास’ गमवावा लागला. शिवसेना, भाजप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी थोडी अधिक जागरुकता दाखवून बारा, पंधरा हजार मतांची जोडणी केली असती, तर ‘कोल्हापूर’सुद्धा देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात आले असते. शिवसेनेची कोल्हापुरात स्थापना होऊन आता पंचवीस वर्षे झाली. या पंचवीस वर्षांत शिवसेनेला सुरेश साळोखे (२ वेळा), दिलीप देसाई, बाबासाहेब पाटील-सरुडकर, सत्यजीत पाटील-सरुडकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर असे आठ आमदार मिळाले. तीन अपक्ष आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु आतापर्यंत एकही खासदार मिळाला नाही. १९९१ पासून आजअखेर २३ वर्षांत शिवसेनेने जंगजंग पछाडले. शुक्रवारी विजयी झालेले युवा नेते धनंजय महाडिक, सहकारातील तज्ज्ञ विक्रमसिंह घाटगे यांच्यासारख्या दिग्गजांना सोबत घेऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयोग करून पाहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनतेला साद घालून पाहिली. जिंकण्यासाठी जे काही करायचे ते करून पाहिले. मात्र त्यांना यश आले नाही. त्याला कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारची मजबूत पकड आणि या सहकाराच्या जाळ्यात ओवले गेलेले मतदार! सहकाराचे जाळे भेदून राजकारण करण्यात शिवसेनेला सतत अपयश आले. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी होती. उमेदवार तोडीचा होता. उमेदवाराच्या नावाला राजकीय करिष्मा होता. त्यामुळेच यावेळी जिंकण्याची संधी जास्त होती. पण ही संधीही शिवसेनेने दवडली. शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणाने उचल घेतली आहे. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव अशा तीन जिल्हाप्रमुखांची तोंडं तीन दिशेला आहेत. शहराचे आमदार राजेश क्षीरसागर व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या कामाची पद्धत या तिघांपेक्षा वेगळी आहे. शिवसैनिक या पक्षांतर्गत राजकारणात अडकून पडले आहेत. त्यामुळे ‘टीमवर्क’ तसेच पक्षहिताला जागा राहिलेली नाही. राजकीय शक्ती विभागली गेली असल्याने त्याचा संघटन मोठे व्हायला उपयोग होत नाही. अशीच परिस्थिती भविष्यकाळातही राहिली तर पुढची आणखी पंचवीस वर्षे शिवसेनेला खासदारासाठीची प्रतीक्षा करावी लागेल. यावेळेची निवडणूक शिवसैनिकांना प्रेरणा व उत्साह देणारी होती. नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने बरेचसे काम हलके करून ठेवले होते. सरकारविरोधी मतदारांमध्ये संतापाची लाट होती. संजय मंडलिक यांच्यासारखा राजकीय करिष्मा लाभलेला उमेदवार होता. फक्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांना राजकीय लाटेवर स्वार व्हायचे होते. पण घडले उलटेच. आमदार असोत की जिल्हाप्रमुख यांनी आपली जुनीच मानसिकता कायम ठेवली. प्रत्येकजण जुनेच वाद गोंजारत राहिले. विजय देवणे लोकसभेला इच्छुक होते. त्यांना डावलल्यामुळे ते नाराज होते. त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सक्रीय होण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. शिवसेना आणि उमेदवार मंडलिक यांच्यात प्रचाराच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव होता. उमेदवाराची दिशा एकीकडे, तर शिवसैनिकांची दिशा दुसरीकडेच राहिली. ही एकवाक्यता जमून आणता आणता उमेदवारांनाही फेस आला. शिवसेनेतच एकवाक्यता नसेल तेथे भाजप, आरपीआय (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारात कुणी सक्रीय करायचे हा प्रश्नच होता. सहकारी पक्षाचे कार्यकर्तेही जबाबदारी नसल्यासारखेच वागले. शिवसेनेला करवीर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाली. करवीरमध्ये तर चंद्रदीप नरके शिवसेनेचे आमदार आहेत. करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. असे असताना संजय मंडलिक यांच्यापेक्षा धनंजय महाडिक यांना करवीरमध्ये ३४ हजारांचे, तर राधानगरी-भुदरगडमध्ये २३ हजारांचे मताधिक्य मिळते, हेच उघड गुपीत आहे. या तीन तालुक्यांत महायुतीचा धर्म नेते मंडळींनी तंतोतंत पाळला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. राजकारणात आधी स्वत:चा आणि मग आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहण्याची मानसिकता असते. आपले मित्र कोण आहे, आपल्याला कोणाची मदत होणार आहे, याचा अभ्यास राजकारणात केला जातो. अशा प्रकारच्या बेरजेच्या राजकारणाचा विधानसभा समोर ठेवून विचार झाल्यानेच मंडलिक पराभूत झाले. त्याशिवाय करवीर, राधानगरी व भुदरगड येथून दगाबाजी होण्याची शक्यता नाही. मंडलिकांच्या आणि शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण करताना सोयीचे राजकारण आणि गाफीलपणा नडला, असेच म्हणावे लागेल. आता ही संधी शिवसेनेला पुन्हा लवकर येणार नाही.