शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:05 IST

गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला.

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून गवा नागरी वस्तीमध्ये फिरत आहे. त्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी तुम्ही काय केले?, तुमच्या विभागातील कर्मचारी काय करत आहेत?, अशी विचारणा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरातील उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना बुधवारी धारेवर धरले. गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला.वनविभागाकडून गवत आणि पाण्याची व्यवस्था होत नसल्याने गवे जंगलातून नागरी वस्तीमध्ये येत आहेत. एक गवा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात फिरत आहे. त्यातून भुयेवाडी येथील दुर्घटना घडून एका युवकाचा बळी गेला. अजूनही गव्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. या विभागातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात असा सवाल विजय देवणे यांनी उपस्थित केला.

हत्ती, गव्यासारखे वन्यप्राणी नागरी वस्तीत येणार नाहीत याबाबत उपाययोजना करण्याचे काम वनविभागाचे आहे. ते या विभागाकडून सक्षमपणे होत नसल्याचे दिसत आहे. बदल्यांच्या भानगडीत अधिकारी गुंतल्याचे दिसते. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवचन, सल्ला देण्यापेक्षा त्रुटी दूर केल्या असत्या, तर बरे झाले असते, असे संजय पवार यांनी सांगितले. ट्रंक्युलिझर गन, पुरेसे कर्मचारी आहेत का? विचारणा करत त्यांनी आवश्यक पाऊले तातडीने उचलून गव्याला त्याच्या अधिवासात लवकर सोडण्याची मागणी केली.

त्यावर उपवनसंरक्षक काळे यांनी प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांची मदत होत आहे. गव्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात पाठविले जाईल, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, गीता चौगुले, मंजित माने, कृष्णात पोवार, उदय सुतार, सतीश कुरणे, उत्तम पाटील, तानाजी चौगुले, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, प्रसाद देवणे उपस्थित होते.मयत युवकाच्या कुटुंबीयांना ५० लाख द्यावेतभुयेवाडीतील मयत युवकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्यावेत. या कुटुंबातील एकाला वनविभागात नोकरीस घ्यावे. भुयेवाडी येथील प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन आम्ही उपवनसंरक्षक काळे यांना दिले आहे. काळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना कक्षाबाहेर जाण्यास सांगणे चुकीचे होते. त्याचा निषेध आम्ही केला असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाforest departmentवनविभाग