शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:05 IST

गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला.

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून गवा नागरी वस्तीमध्ये फिरत आहे. त्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी तुम्ही काय केले?, तुमच्या विभागातील कर्मचारी काय करत आहेत?, अशी विचारणा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरातील उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना बुधवारी धारेवर धरले. गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला.वनविभागाकडून गवत आणि पाण्याची व्यवस्था होत नसल्याने गवे जंगलातून नागरी वस्तीमध्ये येत आहेत. एक गवा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात फिरत आहे. त्यातून भुयेवाडी येथील दुर्घटना घडून एका युवकाचा बळी गेला. अजूनही गव्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. या विभागातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात असा सवाल विजय देवणे यांनी उपस्थित केला.

हत्ती, गव्यासारखे वन्यप्राणी नागरी वस्तीत येणार नाहीत याबाबत उपाययोजना करण्याचे काम वनविभागाचे आहे. ते या विभागाकडून सक्षमपणे होत नसल्याचे दिसत आहे. बदल्यांच्या भानगडीत अधिकारी गुंतल्याचे दिसते. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवचन, सल्ला देण्यापेक्षा त्रुटी दूर केल्या असत्या, तर बरे झाले असते, असे संजय पवार यांनी सांगितले. ट्रंक्युलिझर गन, पुरेसे कर्मचारी आहेत का? विचारणा करत त्यांनी आवश्यक पाऊले तातडीने उचलून गव्याला त्याच्या अधिवासात लवकर सोडण्याची मागणी केली.

त्यावर उपवनसंरक्षक काळे यांनी प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांची मदत होत आहे. गव्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात पाठविले जाईल, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, गीता चौगुले, मंजित माने, कृष्णात पोवार, उदय सुतार, सतीश कुरणे, उत्तम पाटील, तानाजी चौगुले, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, प्रसाद देवणे उपस्थित होते.मयत युवकाच्या कुटुंबीयांना ५० लाख द्यावेतभुयेवाडीतील मयत युवकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्यावेत. या कुटुंबातील एकाला वनविभागात नोकरीस घ्यावे. भुयेवाडी येथील प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन आम्ही उपवनसंरक्षक काळे यांना दिले आहे. काळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना कक्षाबाहेर जाण्यास सांगणे चुकीचे होते. त्याचा निषेध आम्ही केला असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाforest departmentवनविभाग