शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिरोळला ४४ वर्षांनंतर मिळाली मंत्रिपदाची संधी, यड्रावकर ठरले डार्कहॉर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:26 IST

शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामार्फत लावलेल्या ‘जोडण्या’ या सर्वांमुळेच राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली.

ठळक मुद्देशिरोळला ४४ वर्षांनंतर मिळाली मंत्रिपदाची संधीयड्रावकर ठरले डार्कहॉर्स : पवार यांचा शब्द व जोडण्या कारणीभूत

कोल्हापूर : शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामार्फत लावलेल्या ‘जोडण्या’ या सर्वांमुळेच राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली.

या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार हे १९७६ पर्यंत शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.गेले महिनाभर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या येत होत्या; परंतु त्यामध्ये यड्रावकर यांचे नाव फारसे चर्चेत आले नव्हते. कारण तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपदे विभागली आहेत. त्यामुळे अपक्षांना फारशी संधी मिळण्याची शक्यता नव्हती; परंतु यड्रावकर यांनी निवडणुकीत जसा विजय खेचून आणला तसेच मंत्रिपदही खेचून आणले.

आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांनी प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड दिले. पक्षाने त्यांना दोन वेळी आमदारकीची उमेदवारी नाकारली, तरी त्यांनी धीर न सोडता व पक्षनेतृत्वावर कोणतेही आगपाखड न करता निवडणूक लढविली व यश मिळविले.राजेंद्र पाटील हे नरंदे येथील शरद कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय कुरुंदवाडची पार्वती सूतगिरणी, यड्राव बँक, अखिल भारतीय सहकारी स्पिनिंग मिल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राज्यातील व देशातीलही साखर कारखानदारी अडचणीत असताना त्यांनी गेले अनेक वर्षे तो चांगला चालवून दाखविला आहे. त्यांच्या सगळ्याच संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहेत.

कुणावर टीका नाही की, आगपाखड नाही. संधी मिळाली तर स्वागत, नाही मिळाली तर स्वत:चा मार्ग निर्माण करणार, ही त्यांच्या कामाची धाटणी. प्रसिद्धीची फारशी हाव नाही. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ जसे लोकांना भिडणारे काम करतात त्याच धाटणीचे काम करणारा हा नेता आहे. त्यामुळे आताचे राज्यमंत्रिपद हे आमच्या संघर्षाचे फळ आहे, अशीच त्यांच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे.खरे किंगमेकरयड्रावकर यांच्या विजयात व आता राज्यमंत्रिपद मिळण्यातही लहान भाऊ संजय पाटील यांचे प्रयत्न फारच महत्त्वाचे ठरले. पडद्याआड गाठीभेटी घेऊन गेले पंधरा दिवस त्यांनी नेटाने ताकद लावली, तिला यश आले. त्यासाठी गेले पंधरा दिवस ते मुंबईत तळ ठोकून होते.पहिल्यांदा आमदार ते थेट राज्यमंत्रीचयड्रावकर यांना आमदार होण्यासाठी अगोदर दोनवेळा पराभूत व्हावे लागले; परंतु एकदा आमदार झाल्यावर पहिल्याच प्रयत्नात थेट राज्यमंत्रिपद मिळवून तो बॅकलॉग मात्र त्यांनी भरून काढला.वडिलांची पुण्याईयड्रावकर यांचे वडील शामराव पाटील-यड्रावकर हे सहकारातील जाणते नेतृत्व. एक काळ रत्नाप्पाण्णा कुंभार व यड्रावकर यांच्यातील एकजुटीने व नंतर त्यांच्यातील संघर्षही जिल्ह्याने अनुभवला. परंतु, त्यांच्यानंतर तितक्याच नेटाने गट व विविध संस्थांची उभारणी करून राजेंद्र व संजय या बंधूनींही राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. जयसिंगपूरच्या राजकारणावरही या घराण्याची एकतर्फी सत्ता आहे. 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर