शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शिरोळ तालुक्याची ‘जीवनदायिनी’ धोक्यात

By admin | Updated: December 28, 2015 00:24 IST

बावीस गावांना वरदान : पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची दुरवस्था; गळती कायम

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील नागरिकांना ‘जीवनदायी’ ठरलेला आणि शेतकऱ्यांना ‘वरदान’ असलेला राजापूर बंधारा कमकुवत बनल्यामुळे तो अखेरची घटका मोजत आहे. बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड निघून गेले आहेत. बरगे घालूनही गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी गळतीचा फायदा कर्नाटक राज्याला होत आहे. कमकुवत झालेला हा बंधारा ढासळला तर तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. वेळीच या बंधाऱ्याकडे लक्ष न दिल्यास तालुक्यावर पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला राजापूर येथील बंधारा तालुक्यातील नागरिकांना जीवनदायी म्हणून ओळखला जातो. १९८० ला हा बंधारा बांधण्यात आला. उन्हाळ्यात पाणी आडवून राजापूरसह मजरेवाडी, कुरुंदवाड, अकिवाट, नृसिंंहवाडी, औरवाड, गौरवाड, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, आलास, बुबनाळ, बस्तवाड, शिरोळ, कनवाड, कुटवाड, घालवाड, शिरटी, धरणगुत्ती, आगर, हसूर, राजापूरवाडी आदी २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरावा यासाठी राजापूर बंधारा बांधण्यात आला. या २२ गावांबरोबरच इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा याच कृष्णेच्या पात्रातून होतो. गेल्या ३५ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. कृष्णेच्या पाण्यावर असलेली शेती सुजलाम्, सुफलाम् बनल्याने तालुक्याचा विकास झाला आहे. राजापूर बंधारा हा आता कमकुवत बनला आहे. एकूण ६५ गाळे या बंधाऱ्यावर असून बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड पाण्याच्या प्रवाहामुळे निखळून गेले आहेत. बहुतांश गाळ्यांतील दगड निघून गेले आहेत. २००५ ला आलेल्या महापुरात झाडाचे मोठमोठे बुंधे बंधाऱ्याला येऊन तटल्यामुळे बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्यावर बरगे घातले तरी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना गळतीमुळे पाणी वाया जाते. बंधारा दुरुस्त करावयाचा झाल्यास एक वर्ष बरगे घालता येणार नाहीत. बंधाऱ्याची दुरुस्ती जरी झाली तरी ३५ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार हा प्रश्नही उपस्थित होत आहे. कमकुवत बनत चाललेला राजापूर बंधारा एक-दोन वर्षांत ढासळला तर येथे बंधारा होता असे म्हणण्याची वेळ येऊ नये.शिरोळ तालुक्यातील २२ हून अधिक गावांना वरदान ठरलेला राजापूर बंधारा दुर्लक्षित झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारा हा बंधारा अखेरची घटका मोजत आहे. ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळतात, तर सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेला हा बंधारा कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची ही अवस्था बनली आहे. याचा वेध घेणारी ‘राजापूर बंधाऱ्याला अवकळा’ ही मालिका आजपासून...कर्नाटककडून बंधारा टार्गेट?शिरोळ तालुक्यातील गावांना या धरणातून बॅकवॉटरचे पाणी मिळते. सन २००३ ला उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. धरणात पुरेसे पाणी नसल्याने कर्नाटकाकडे पाणीपुरवठा केला गेला नव्हता. याचा राग मनात धरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी रात्रीत धरणावर हल्ला करून बरगे काढून धरण फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बोध घेता आणि यंदा पाऊस कमी झाल्याने व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाणी समस्या निर्माण होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने दखल न घेतल्यास बंधाऱ्याचे पाणी पुन्हा पेटण्यास वेळ लागणार नाही.