शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यात ‘ओव्हरलोड’कडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:01 IST

जयसिंगपूर : कर्नाटक हद्दीतून शिरोळ तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु प्रादेशिक परिवहन विभागाकडून या वाहतुकीकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो. त्यामुळे अशा ओव्हरलोड वाहतुकीला आळा कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दोन जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागाशी ...

जयसिंगपूर : कर्नाटक हद्दीतून शिरोळ तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु प्रादेशिक परिवहन विभागाकडून या वाहतुकीकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो. त्यामुळे अशा ओव्हरलोड वाहतुकीला आळा कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दोन जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागाशी जोडला जाणारा शिरोळ तालुका दळवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बनला आहे. तालुक्यातील कागवाड-गणेशवाडी, दत्तवाड-सदलगा, दानवाड-एकसंबा या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. कर्नाटकातून दररोज शिरोळ तालुक्याच्या मार्गावर अशी वाहने सर्रासपणे धावत आहेत. रात्रीच्या वेळी अनेक ओव्हरलोड वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. कागवाड-गणेशवाडी मार्गे सहा चाकीपासून सोळाचाकीपर्यंत वाहने बॉक्साईट, लाकूड, सिमेंट, माती, वाळू अशी गौण खनिजे घेऊन वाहतूक करीत आहेत.कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातील रस्ते पक्के झाले आहेत. अन्य निधीही रस्त्यांना मिळत आहे. मात्र, कर्नाटकातील ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. अशा वाहतुकीमुळे रस्ते खचण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी रस्त्यावर खर्च केला जात आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे ओव्हरलोड वाहतुकीने डोके वर काढले आहे. गणेशवाडी-कागवाड मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीचा ट्रक व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात महिला ठार झाली होती. क्षमतेपक्षा जादा माल भरल्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर चालकाचे नियंत्रण राहत नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वाहनांवर कारवाईची थेट मोहीम सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.