शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ तालुका वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

संदीप बावचे शिरोळ : पंधरा वर्षे संचालक व अध्यक्षपद भूषविलेल्या शिरोळ तालुक्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत ...

संदीप बावचे

शिरोळ : पंधरा वर्षे संचालक व अध्यक्षपद भूषविलेल्या शिरोळ तालुक्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून उमेदवारी दिली नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे चित्र आहे. त्यामुळे १३४ सभासद असलेल्या तालुक्यातील मतदारांचा फायदा कोणत्या आघाडीला होणार, अशी चर्चा सुरू आहे.

गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतून पंधरा वर्षे संचालक म्हणून काम केले आहे, तर त्यांना अध्यक्षपदाचीही संधी मिळाली होती.

युती सरकारच्या काळात भाजपचे अनिल यादव यांना गोकुळचे संचालक पद मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता होती. गोकुळचे माजी अध्यक्ष पाटील यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले, भीमगोंडा बोरगांवे यांच्यासह अन्य ठरावधारक सभासदांनी उमेदवारीसाठी नेत्यांना साकडे घातले होते. परंतु, सत्ताधारी व विरोधी आघाडीतून शिरोळमधील एकाही ठरावधारक सभासदाला नेत्यांनी उमेदवारी दिलेली नाही.

गोकुळच्या या निवडणुकीत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश आले नाही. दरम्यान, माजी खासदार शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

शिरोळ तालुक्याने राज्यासह जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. जिल्ह्यातील सर्वच शिखर संस्थांचे अध्यक्षपद ठरविण्याचे काम या तालुक्यानेच केले आहे. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी ज्यांना राजकारणात आणले ते आज जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, ज्यांचे बोट धरून राजकारणात आले ते नेतेच आज स्व. कुंभार यांच्या जन्म व कर्मभूमीला विसरले आहेत.

चार नद्या असणारा शिरोळ तालुका हिरवागार असून, शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. गोकुळचा सॅटेलाईट डेअरी प्रकल्पही तालुक्यात आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांत सहकारापासून काहीसा तालुका दुरावला असल्याने ठरावधारकांची संख्या कमी आहे. यामुळेच दोन्ही आघाड्यांनी शिरोळ तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.