शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

आजऱ्यात राष्ट्रवादीसह शिंपी गटात उत्साह

By admin | Updated: August 30, 2015 23:05 IST

जयवंतराव शिंपींचे राजकीय पुनर्वसन : तालुका संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजयाने बळ

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -तडजोडीच्या राजकारणात नकळतपणे घेतल्या गेलेल्या एखाद्या निर्णयाची इतकी मोठी किंमत मोजावी लागते की, जवळचेही दूर जातात. अपयशाची परंपरा सुरू होते, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पुन्हा संधीची वाट पाहणे एवढेच हाती राहते आणि ती संधी मिळाल्यावर पुन्हा राजकीय पटलावर मनाजोगे फासे पडू लागतात असाच काहीसा प्रकार जयवंतराव शिंपी यांच्याबाबत घडला. तालुका संघ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील विजयाने केवळ जयवंतरावांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही, तर राष्ट्रवादीचेही ‘बळ’ वाढले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. गत जिल्हा बँक निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही उमेदवारी ऐनवेळी काशीनाथअण्णा यांना दिली आणि राजकीय पिछेहाट स्वत:हून ओढवून घेतली. बळिरामदादांचा शब्द डावलायचा नाही म्हणून उमेदवारीसह ठरावांची रसदही काशीनाथअण्णा चराटी यांना पुरविली. दुर्दैवाने काशीनाथअण्णा, बळिरामदादांचे निधन झाले. याचा फटका जयवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीस बसला. वरिष्ठ नेत्यांनी काशीनाथअण्णांच्या जागी जिल्हा बँकेत अशोकअण्णांची वर्णी लावली. आणि नवीन राजकीय समीकरणात विरोधक वाढले ते एकवटले.एकीकडे कारखान्याच्या अडचणी वाढत असतानाच दुसरीकडे राजकीय खिंडीत पकडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी झाले. कारखाना, जिल्हा परिषद येथे एकतर्फी लढत देऊन निसटत्या पराभवांना सामोरे जावे लागले. तालुक्यात सर्वांत प्रबळ असणाऱ्या ‘शिंपी’ गटाची मोडतोड झाली. आघाड्यांचे नवीन राजकारण तालुक्यात अस्तित्वात आले. राजू पोतनीस, प्रकाश कुंभार यांच्यासारखे खंदे समर्थक विरोधकांच्या छावणीत दाखल झाले. होणाऱ्या सर्व घडामोडी शांतपणे पाहत जयवंतरावांनी तब्बल साडेचार वर्षे राजकीय वनवास भोगला. राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या कुरबुरींचा परिणाम म्हणून के. पी. पाटलांना आमदारकी गमवावी लागली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना राष्ट्रवादीलाही नेटक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज भासू लागली. राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनी जयवंतरावांना जवळ केले. जयवंतरावांनाही फायदा झाला. राष्ट्रवादीचेही बळ वाढले. जयवंतरावांची अपयशाची मालिका खंडित झाली.जनता बँक आणि साखर कारखान्यात सक्षम पॅनेल बनण्यास ‘जयवंतराव’ नावाचे वलय राष्ट्रवादीला उपयोगी ठरणार आहे. उतावळेपणामुळे तालुक्यातील अनेकांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येत असताना संयमाने राजकारण करणाऱ्या जयवंतरावांना मात्र पुन्हा ‘लिफ्ट’ मिळत आहे.