शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:28 IST

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देऊसदराचा प्रश्न वर्चस्वाच्या वादात पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांत श्रेयवाद रंगणारदोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल

कोल्हापूर , दि. २१ : खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

आता बाजारात साखरेचा दर क्विंटलला ३५०० पर्यंत आहे. महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० रुपये होते. कोल्हापूर जिल्ह्यात उतारा जास्त असल्यामुळे ती २७०० ते ३२०० पर्यंत जाते. राज्य बँक ३५०० रुपये दर निश्चित करून तिचे मूल्यांकन करते. साखरेच्या दराच्या ८५ टक्के मूल्यांकन विचारात घेता ही रक्कम २९७५ रुपये होते.

सदाभाऊंच्या संघटनेने एफआरपी व त्यात ३०० वाढीव एवढ्या पहिल्या उचलीची मागणी केली आहे. कारखान्यांना सगळी मिळून २९७५ रुपये उचल मिळाल्यावर त्यातील फक्त ऊसदरासाठीच ३१०० रुपये कसे देणार, असा कारखानदारीसमोर पेच आहे. त्यामुळे यंदाही दोन टप्प्यांत पहिली उचल द्यायचा तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

जेव्हा साखरेला चांगले पैसे मिळतात, तेव्हा कारखानदारीने स्वत:हून शेतकऱ्याना चांगला दर दिला आहे, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे हिंसक आंदोलनापेक्षा समन्वयातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

यंदा राज्यात सुमारे ६३० लाख टन ऊस उपलब्ध असल्याचा राज्य शासनाचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने गळिताचा अंदाज खोटा ठरण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस इतर खरीप पिकांना हानिकारक ठरला तरी उसाची वाढ मात्र जोमदार झाली आहे. त्यामुळे टनेज वाढणार आहे.

कायद्याने उसाला एफआरपी चौदा दिवसांच्या आत एकरकमी देणे बंधनकारक असते. त्यामुळे एफआरपी देऊन हंगाम सुरू व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला अडचणीत आणण्यासाठी सदाभाऊंनी एफआरपी व टनास ३०० रुपये जादा मिळवून देणार अशी घोषणा केली आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या अगोदर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे त्यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद २८ तारखेला आहे. त्यामुळे तिथे पहिल्या उचलीची काय मागणी होते, हे महत्त्वाचे आहे. त्या अगोदर सदाभाऊंनी काही तोडगा काढला तर तो शेट्टी यांना मान्य होणार नाही; त्यामुळे या दोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल होणार आहेत.

ऊस परिषदेच्या आधी पहिल्या उचलीसाठी बैठक घ्यायची कुणाला घाई झाली असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला तर आम्हीही त्याचे स्वागतच करू. आम्हांला कारखानदारांकडूनही काही प्रस्ताव आला तर त्यावरही विचार करायला तयार आहोत. आम्हीच दर ठरवू ही आमची भूमिका नाही. जे शेतकऱ्याच्या हिताचे असेल ते मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत त्यासाठी सरकारबरोबर संघर्ष केला आहे. यंदा तो कारखानदारांसमवेत करावा लागला तर त्यालाही आमची तयारी आहे.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत