शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:28 IST

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देऊसदराचा प्रश्न वर्चस्वाच्या वादात पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांत श्रेयवाद रंगणारदोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल

कोल्हापूर , दि. २१ : खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

आता बाजारात साखरेचा दर क्विंटलला ३५०० पर्यंत आहे. महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० रुपये होते. कोल्हापूर जिल्ह्यात उतारा जास्त असल्यामुळे ती २७०० ते ३२०० पर्यंत जाते. राज्य बँक ३५०० रुपये दर निश्चित करून तिचे मूल्यांकन करते. साखरेच्या दराच्या ८५ टक्के मूल्यांकन विचारात घेता ही रक्कम २९७५ रुपये होते.

सदाभाऊंच्या संघटनेने एफआरपी व त्यात ३०० वाढीव एवढ्या पहिल्या उचलीची मागणी केली आहे. कारखान्यांना सगळी मिळून २९७५ रुपये उचल मिळाल्यावर त्यातील फक्त ऊसदरासाठीच ३१०० रुपये कसे देणार, असा कारखानदारीसमोर पेच आहे. त्यामुळे यंदाही दोन टप्प्यांत पहिली उचल द्यायचा तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

जेव्हा साखरेला चांगले पैसे मिळतात, तेव्हा कारखानदारीने स्वत:हून शेतकऱ्याना चांगला दर दिला आहे, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे हिंसक आंदोलनापेक्षा समन्वयातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

यंदा राज्यात सुमारे ६३० लाख टन ऊस उपलब्ध असल्याचा राज्य शासनाचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने गळिताचा अंदाज खोटा ठरण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस इतर खरीप पिकांना हानिकारक ठरला तरी उसाची वाढ मात्र जोमदार झाली आहे. त्यामुळे टनेज वाढणार आहे.

कायद्याने उसाला एफआरपी चौदा दिवसांच्या आत एकरकमी देणे बंधनकारक असते. त्यामुळे एफआरपी देऊन हंगाम सुरू व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला अडचणीत आणण्यासाठी सदाभाऊंनी एफआरपी व टनास ३०० रुपये जादा मिळवून देणार अशी घोषणा केली आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या अगोदर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे त्यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद २८ तारखेला आहे. त्यामुळे तिथे पहिल्या उचलीची काय मागणी होते, हे महत्त्वाचे आहे. त्या अगोदर सदाभाऊंनी काही तोडगा काढला तर तो शेट्टी यांना मान्य होणार नाही; त्यामुळे या दोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल होणार आहेत.

ऊस परिषदेच्या आधी पहिल्या उचलीसाठी बैठक घ्यायची कुणाला घाई झाली असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला तर आम्हीही त्याचे स्वागतच करू. आम्हांला कारखानदारांकडूनही काही प्रस्ताव आला तर त्यावरही विचार करायला तयार आहोत. आम्हीच दर ठरवू ही आमची भूमिका नाही. जे शेतकऱ्याच्या हिताचे असेल ते मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत त्यासाठी सरकारबरोबर संघर्ष केला आहे. यंदा तो कारखानदारांसमवेत करावा लागला तर त्यालाही आमची तयारी आहे.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत