शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:28 IST

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देऊसदराचा प्रश्न वर्चस्वाच्या वादात पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांत श्रेयवाद रंगणारदोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल

कोल्हापूर , दि. २१ : खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

आता बाजारात साखरेचा दर क्विंटलला ३५०० पर्यंत आहे. महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० रुपये होते. कोल्हापूर जिल्ह्यात उतारा जास्त असल्यामुळे ती २७०० ते ३२०० पर्यंत जाते. राज्य बँक ३५०० रुपये दर निश्चित करून तिचे मूल्यांकन करते. साखरेच्या दराच्या ८५ टक्के मूल्यांकन विचारात घेता ही रक्कम २९७५ रुपये होते.

सदाभाऊंच्या संघटनेने एफआरपी व त्यात ३०० वाढीव एवढ्या पहिल्या उचलीची मागणी केली आहे. कारखान्यांना सगळी मिळून २९७५ रुपये उचल मिळाल्यावर त्यातील फक्त ऊसदरासाठीच ३१०० रुपये कसे देणार, असा कारखानदारीसमोर पेच आहे. त्यामुळे यंदाही दोन टप्प्यांत पहिली उचल द्यायचा तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

जेव्हा साखरेला चांगले पैसे मिळतात, तेव्हा कारखानदारीने स्वत:हून शेतकऱ्याना चांगला दर दिला आहे, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे हिंसक आंदोलनापेक्षा समन्वयातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

यंदा राज्यात सुमारे ६३० लाख टन ऊस उपलब्ध असल्याचा राज्य शासनाचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने गळिताचा अंदाज खोटा ठरण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस इतर खरीप पिकांना हानिकारक ठरला तरी उसाची वाढ मात्र जोमदार झाली आहे. त्यामुळे टनेज वाढणार आहे.

कायद्याने उसाला एफआरपी चौदा दिवसांच्या आत एकरकमी देणे बंधनकारक असते. त्यामुळे एफआरपी देऊन हंगाम सुरू व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला अडचणीत आणण्यासाठी सदाभाऊंनी एफआरपी व टनास ३०० रुपये जादा मिळवून देणार अशी घोषणा केली आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या अगोदर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे त्यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद २८ तारखेला आहे. त्यामुळे तिथे पहिल्या उचलीची काय मागणी होते, हे महत्त्वाचे आहे. त्या अगोदर सदाभाऊंनी काही तोडगा काढला तर तो शेट्टी यांना मान्य होणार नाही; त्यामुळे या दोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल होणार आहेत.

ऊस परिषदेच्या आधी पहिल्या उचलीसाठी बैठक घ्यायची कुणाला घाई झाली असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला तर आम्हीही त्याचे स्वागतच करू. आम्हांला कारखानदारांकडूनही काही प्रस्ताव आला तर त्यावरही विचार करायला तयार आहोत. आम्हीच दर ठरवू ही आमची भूमिका नाही. जे शेतकऱ्याच्या हिताचे असेल ते मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत त्यासाठी सरकारबरोबर संघर्ष केला आहे. यंदा तो कारखानदारांसमवेत करावा लागला तर त्यालाही आमची तयारी आहे.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत