शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सावलीच्या बंडाने शेट्टी घायाळ, कार्यकर्ते सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:02 IST

प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस्थेत आहेत.

ठळक मुद्देसमजूत घालण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ स्वत: शेट्टी मात्र बैठका आणि दौऱ्यात व्यस्त

कोल्हापूर : प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस्थेत आहेत.

गुरुवारी कार्यकर्त्यांची मादनाईक आणि पाटील यांच्या घरी समजूत घालण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. या सर्व प्रकाराने उद्विग्न झालेले शेट्टी हे फोन बंद ठेवून दैनंदिन कामासाठी बाहेर पडले. पन्हाळ्यातील केखले येथील आजारी कार्यकर्त्याच्या विचारपूस करण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. स्वत: दु:खात असतानाही या दौऱ्याने शेट्टी यांच्यातील लढाऊ बाणा पुन्हा एकदा सिद्ध झाला.दरम्यान, शेट्टी यांनी आमदारकीची ब्यादच नको म्हणून विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्याचा निर्णय फेसबुकवरील पोस्टद्वारे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या घरी धाव घेतली. ह्यतुम्हीच आमदार व्हा, माघार घेऊ नका,ह्ण असा आग्रह त्यांच्याकडून सुरू होता; पण शेट्टी यांनी ह्यकार्यकर्त्यांच्या मतापलीकडे मी नाही. ते जो निर्णय देतील तो मान्य असेल,ह्ण असे सांगत दौऱ्यासाठी बाहेर पडणे पसंत केले.गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या इचलकरंजी पाणीप्रश्नावरील बैठकीत त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असलेले हातकणंगलेचे माजी सभापती राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पन्हाळा तालुक्यातील माले व पोखले येथे सांत्वनपर भेट दिल्यानंतर केखले येथील संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेले नरके मामा यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांची भेट घेऊन त्यांच्याही प्रकृतीची विचारपूस केली.मादनाईक यांची नाराजी कायमसावकर मादनाईक यांनी बंडाची भाषा केल्यानंतर त्यांची समजूत घालण्यासाठी कार्यकर्त्याची घरी रीघ लागली होती, त्यावर मी चळवळ सोडणार नाही, संघटनेतच काम करणार आहे,ह्ण असे स्पष्ट करतानाच ह्यपदाची अपेक्षा केली हे चुकले काय? अशा शब्दांत आपली नाराजी कायम असल्याचे सांगितले.

दोन वेळा आमदारकी लढवूनही पराभूत व्हावे लागल्याने पद मिळावे अशी अपेक्षा होती. शेट्टींना विरोध नाही, त्यांना शुभेच्छा आहेत; पण त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना आपला निर्णय राखून ठेवला आहे, वेळ आल्यावर कळेल, अशी गुगलीही टाकली आहे.घरातला वाद आहे, घरातच मिटेलबंडाचे निशाण फडकवणारे प्रा. जालंदर पाटील यांनी गुरुवारी काहीसे नमते घेत ह्यहे घरातले वादळ आहे, घरातच मिटेल, असे सांगून चळवळीत सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची मते अजमावली जात आहेत. आमचा शेट्टी यांच्या आमदारकीला विरोध नाही, फक्त आम्ही अपेक्षा व्यक्त केली. इतकी वर्षे चळवळीत कायम करत आहे म्हटल्यावर पदाची अपेक्षा ही असणारच. यावर आता स्वत: शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्याशी चर्चा करून जे ठरेल त्याला पाठिंबा असणार आहे, असेही प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर