शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेट्टी-आठवले यांना केंद्रात मंत्रिपद

By admin | Updated: November 4, 2014 00:44 IST

चंद्रकांतदादा पाटील : मंत्रिमंडळाचा विस्तार १५ नोव्हेंबरनंतर

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा विस्तार येत्या पंधरा नोव्हेंबरनंतरच होईल. तत्पूर्वी १२ तारखेला सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री व राज्यातही सत्तेत संधी दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.निवासस्थानी सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी व्हावे असाच आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या निर्णयाशी मंत्रिमंडळाचा विस्तार जोडला गेलेला आहे. शिवसेनेला १४ मंत्रिपदे हवी आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यात कुणाला संधी मिळणार या आजच्याघडीला ‘जर-तर’च्या गोष्टी झाल्या आहेत. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली, तर भाजपला कमी मंत्रिपदे मिळतील. घटक पक्षांना आमदार निवडून आणता आले नसले तरी त्यांच्यामुळे भाजपचे आमदार निवडून येण्यात मोलाची मदत झाली हे भाजप कधीच नाकारत नाही म्हणूनच शेट्टी व आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार सुरू आहे. केंद्रात सत्तेत सहभागी करून घेतल्यावर त्या पक्षांना पुन्हा राज्यात किती मंत्रिपदे द्यायची याचा निर्णय चर्चेतून घेऊ. प्रत्येक मतदान बूथला एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बूथप्रमुखाची चिठ्ठी आणल्याशिवाय कुणाचेही स्थानिक पातळीवरील काम करायचे नाही, असे आम्ही ठरविले आहे. कार्यकर्त्याला सन्मान द्यायचा म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले. महापालिकेतही युती..राज्यात भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी झाला, तर मग पुढील वर्षी होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढविण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविण्याचे आमचे धोरण असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.