शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

Lok Sabha Election 2019 : शेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 4:29 PM

सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडेसांगलीच्या जागेसाठीच राहूल आवाडेंचा दबावतंत्र

कोल्हापूर : सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तो मान्यच करावा लागणार आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही आवाडे यांनी व्यक्त केली.आवाडे म्हणाले, सांगली व कोल्हापूरच्या राजकारणाची एकमेकाशी सांगड आहे. त्याचे प्रत्यंतर २००९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही कॉँग्रेसला आले. त्यात बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसकडे पुणे, सोलापूर व सांगली हे तीनच मतदारसंघ आहेत. त्यातील सांगली द्यायचा म्हटला तर कॉग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान होणार, म्हणून या मतदारसंघ आपल्याकडेच रहावा, असा आग्रह होता.

कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचे काम केले. त्यातूनच राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरूवारी रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे व आपली चर्चा झाली. यामध्ये सविस्तर उहापोह झाल्यानंतर आपण सांगलीची जागा मागितली नव्हती.

तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शेवटचा पर्याय सांगली होता, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही जागा वाटपात वरिष्ठ पातळीवरून सांगली ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

समन्वयाने जागेचा प्रश्न सुटल्याने सांगलीतील कोणीही कॉँग्रेसमध्ये जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पिटर चौधरी, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

माझ्या परवानगीनेच बंडराहूल आवाडे यांनी ‘हातकणंगले’तून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना आपली परवानगी घेतली होती. आमच्यामध्ये चर्चा होऊनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

जागा कायमस्वरूपी सोडलेली नाहीसांगलीची जागा आघाडीच्या तडजोडीत ‘स्वाभिमानी’ला सोडलेले आहे. याचा अर्थ कायस्वरूपी गेली असा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीत दिलेली जागा असल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगले