शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कार्यकर्त्यांपेक्षा शेट्टींनी अंगावर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:27 IST

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे ...

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.माढा (जि. सोलापूर) येथे शनिवारी कृषी राज्यमंत्री खोत यांच्या गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाची तोडफोड केली तर खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर बोचरी टीका करत ‘सरकारचे गुणगान गाणाºयांना दगड खावे लागतील,’ असा इशारा दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोत म्हणाले, राजू शेट्टी यांची लढाई आता सरकारसोबत नव्हे तर सदाभाऊंबरोबर आहे. माझ्याकडे असलेले मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर असलेला विश्वास हे शेट्टींच्या संतापाचे मुख्य कारण आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रीत केली आहे. आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना कधीच सहन झालेले नाही. आतापर्यंत त्यांनी आत्मकेंद्रीत विचार आणि व्यक्तिगत आकस केल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.आता त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते गुद्द्यावर आले आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचा ठेका शेट्टींना कोणी दिला? ’ असा सवाल करत. ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची माझी औकात आहे की नाही, हे तपासण्याचे काम शेट्टींनी करू नये. आयुष्यातील तीस वर्षे शेतकºयांच्या भल्यासाठी चळवळीत घातली. आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार, असा इशाराही राज्यमंत्री खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला.बहुजन समाजच धडा शिकवेलआतापर्यंत बहुजन समाजातील लोकांच्याबळावर मोठे झालात, त्याच समाजावर तुम्हीपलटला पण लक्षात ठेवा हाच समाज तुम्हालाधडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असा इशारा राज्यमंत्री खोत यांनी पत्रकातून दिला आहे.