शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कार्यकर्त्यांपेक्षा शेट्टींनी अंगावर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:27 IST

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे ...

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.माढा (जि. सोलापूर) येथे शनिवारी कृषी राज्यमंत्री खोत यांच्या गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाची तोडफोड केली तर खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर बोचरी टीका करत ‘सरकारचे गुणगान गाणाºयांना दगड खावे लागतील,’ असा इशारा दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोत म्हणाले, राजू शेट्टी यांची लढाई आता सरकारसोबत नव्हे तर सदाभाऊंबरोबर आहे. माझ्याकडे असलेले मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर असलेला विश्वास हे शेट्टींच्या संतापाचे मुख्य कारण आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रीत केली आहे. आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना कधीच सहन झालेले नाही. आतापर्यंत त्यांनी आत्मकेंद्रीत विचार आणि व्यक्तिगत आकस केल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.आता त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते गुद्द्यावर आले आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचा ठेका शेट्टींना कोणी दिला? ’ असा सवाल करत. ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची माझी औकात आहे की नाही, हे तपासण्याचे काम शेट्टींनी करू नये. आयुष्यातील तीस वर्षे शेतकºयांच्या भल्यासाठी चळवळीत घातली. आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार, असा इशाराही राज्यमंत्री खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला.बहुजन समाजच धडा शिकवेलआतापर्यंत बहुजन समाजातील लोकांच्याबळावर मोठे झालात, त्याच समाजावर तुम्हीपलटला पण लक्षात ठेवा हाच समाज तुम्हालाधडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असा इशारा राज्यमंत्री खोत यांनी पत्रकातून दिला आहे.