शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कार्यकर्त्यांपेक्षा शेट्टींनी अंगावर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:27 IST

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे ...

कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.माढा (जि. सोलापूर) येथे शनिवारी कृषी राज्यमंत्री खोत यांच्या गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाची तोडफोड केली तर खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर बोचरी टीका करत ‘सरकारचे गुणगान गाणाºयांना दगड खावे लागतील,’ असा इशारा दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोत म्हणाले, राजू शेट्टी यांची लढाई आता सरकारसोबत नव्हे तर सदाभाऊंबरोबर आहे. माझ्याकडे असलेले मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर असलेला विश्वास हे शेट्टींच्या संतापाचे मुख्य कारण आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रीत केली आहे. आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना कधीच सहन झालेले नाही. आतापर्यंत त्यांनी आत्मकेंद्रीत विचार आणि व्यक्तिगत आकस केल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.आता त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते गुद्द्यावर आले आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचा ठेका शेट्टींना कोणी दिला? ’ असा सवाल करत. ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची माझी औकात आहे की नाही, हे तपासण्याचे काम शेट्टींनी करू नये. आयुष्यातील तीस वर्षे शेतकºयांच्या भल्यासाठी चळवळीत घातली. आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार, असा इशाराही राज्यमंत्री खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला.बहुजन समाजच धडा शिकवेलआतापर्यंत बहुजन समाजातील लोकांच्याबळावर मोठे झालात, त्याच समाजावर तुम्हीपलटला पण लक्षात ठेवा हाच समाज तुम्हालाधडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असा इशारा राज्यमंत्री खोत यांनी पत्रकातून दिला आहे.