शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

‘शेकाप’चा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. ११) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. ११) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस, माजी आमदार संपतराव पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

बाजार समित्यांसह जीवनाश्यक वस्तू कायद्यात बदल, कंत्राटी शेती, आदी शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र सरकार दखल देत नाही. शेतकऱ्यांपेक्षा ठरावीक भांडवलदार उद्योगपतींचे हित जोपासले जात आहे. त्यातच गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात भरमसाट वाढ करून सामान्य माणसांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. याविरोधात जनमानसात असंतोष आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळातील वीज बिले पूर्ण माफ करावीत, सक्तीने वीज बिलांची वसुली करू नये, उसाची बिले एकरकमी चौदा दिवसांत मिळावीत, नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मागण्यांसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता ‘शेकाप’ कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संपतराव पवार यांनी केले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर उपस्थित होते.